vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी- राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत

दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत.

नोव्हेंबर २०१२ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता पत्र, उपसंचालक कार्यालयातून जारी केलेले शालार्थ ओळखपत्र आदेश आदी आवश्यक कागदपत्र दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत अपलोड करायची आहेत. पूर्वी ही मुदत दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र ती वाढवून आता १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान या मुदतीनंतर कोणत्याही शाळेने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्यापासून पगार रोखण्यात येईल. याबाबत सर्व शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे नमुंमपा परिवहन उपक्रमाची आयटीएमएस प्रणाली तात्पुरती बंद-बस ट्रॅकर ॲपवर परिणाम

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचाअहवाल तातडीने सादर करावा- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,राज्यातील पुल, साकव आणि सार्वजनिक इमारतींचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पाजवळील शासकीय जमिनींवरआर्थिक केंद्र विकसित करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारा उत्तरवाहिनी रस्त्याच्या कामाचा आढावा

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगरी रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर, प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य–रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती.

सार्वजनिक आणि सरकारी भागीदारीचा नवा अध्याय युवकांसाठी अद्ययावत प्रशिक्षणातून रोजगार निर्मिती- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,आयटीआय आणि टोयोटाच्या उभारलेल्या प्रयोगशाळांचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उद्घाटन छत्रपती संभाजीनगरसह नागपूर विभागातील अद्ययावत प्रयोगशाळांचे अद्ययावतीकरण,उद्योगांना पूरक प्रशिक्षण