vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता

राज्यातील दीड लाख शिक्षकांचा पगार थांबण्याची शक्यता..

राज्य प्रतिनिधी- राज्यातील सुमारे दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत

दीड लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यक कागदपत्रे अद्याप शासनाच्या ‘शालार्थ’ या प्रणालीमध्ये संग्रहित झालेली नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेली अंतिम मुदत संपल्यानंतर अशा शिक्षकांचा पगार थांबविण्याचे आदेश वेतन अधीक्षकांनी दिले आहेत.

नोव्हेंबर २०१२ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये अपलोड करणे बंधनकारक आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता पत्र, उपसंचालक कार्यालयातून जारी केलेले शालार्थ ओळखपत्र आदेश आदी आवश्यक कागदपत्र दिनांक १५ सप्टेंबरपर्यंत अपलोड करायची आहेत. पूर्वी ही मुदत दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत होती. मात्र ती वाढवून आता १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. दरम्यान या मुदतीनंतर कोणत्याही शाळेने दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पुढील महिन्यापासून पगार रोखण्यात येईल. याबाबत सर्व शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित पोस्ट

पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून व्हावी – संचालक शतानिक भागवत  कुंडल वन प्रबोधनीत वन्यजीव सप्ताहाची सुरुवात उत्साहात

रंगनाथ महाराजांची ११० वी पुण्यतिथी सोहळा संपन्न,महाराजांच्या नामस्मरणाने सोहळ्याला दिव्य पावित्र्य लाभले – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

पाटण शहरातील रस्त्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

गरीबशाह बाजार येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंतीचा उत्सव आजपासून बुलढाण्यात..प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांची यावर्षी रेलचेल!

vishwatmaklokswamivarta