vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

ओबीसीचा समाजावरील अन्याय विरोधात खेड तहसिल कार्यालयावर 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा मराठा- कुणबी एक नाहीत, शासन निर्णय रद्द करा !

खेड प्रतिनिधी- मराठ्यांना कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅझेटीयरच्या अंमलबजावणीशी संबंधित दि.2 सप्टेंबर 2025 शासन निर्णय काढला आहे. मराठा, कुणबी एक नाहीत. राजकीयदृष्ट्या प्रबळ आणि प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा सरकारचा निर्णय मनमानीकारक असून, संविधानाचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तहसिल कार्यालयावर ओबीसी समाजाचा 15 सप्टेंबर रोजी धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई खेड अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी यांनी दिली.

हा मोर्चा सोमवार दि.15 सप्टेंबर 2025 रोजी भरणे येथील काळकाई मंदिरापासून -भरणे नाका-छत्रपती शिवाजी चौक-बाजारपेठ-गणपती मंदिर-तीन बत्ती नाका- खेड तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी चालत जाऊन खेड तहसिलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

कुणबी नावाने,ओबीसी मध्ये मराठ्यांची घुसखोरी ताबडतोब थांबवा. महाराष्ट्र सरकारने, हैद्राबाद गॅझेटीयरला मान्यता देणाऱ्या, शासन निर्णयान्वये मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना व त्या अनुषंगाने येणाऱ्या काळात; सातारा, कोल्हापूर इत्यादी गॅझेटीयरना मान्यता देऊन, महाराष्ट्रातील सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी दाखले देऊन, ओबीसी आरक्षणामध्ये घुसविण्याचा घाट घातलेला आहे. त्यामुळे आपले ओबीसी आरक्षण संपूर्णतः धोक्यात आलेले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठ्यांना हैदराबाद गॅझेटमधील नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचे काम तात्काळ थांबवावे.

आपले हक्क व अधिकार आबाधित राहण्यासाठी या मोर्चासाठी खेड तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवानी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई खेडचे अध्यक्ष कृष्णा आग्रे गुरुजी, खेड ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समिती खेडचे अध्यक्ष दिपक शिगवण, कुणबी समाजोन्नती संघ,युवा कार्यकारणी अध्यक्ष सुरज जोगळे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना; भूमिहीन अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेतजमीन..

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ८,१८,२८ वर्षे मुदतीचे रोखे विक्रीस

राज्यातील प्रकल्पांचे भूसंपादन ठरलेल्या वेळापत्रकानुसार पूर्ण करा कोणताही प्रकल्प रखडणार नाही याची सर्व संबंधितानी दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी संविधानाचा अवमान करीत आहेत ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन