vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

स्वच्छ भारतसाठी आयटीआय पॅटर्न,कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री लोढा यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील ७५० गावात स्वच्छता अभियान संपन्न

राज्य प्रतिनिधी-प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात कौशल्य विकास विभागाच्यावतीने “स्वच्छता अभियान” राबविण्यात आले. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून राज्यातील ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो विद्यार्थी व शिक्षकांनी ७५० गावांमध्ये सदर स्वच्छता अभियान राबवले. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२५ रोजी पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत कार्यालयासमोर या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबवले गेले. गावागावांत रस्त्यांपासून शाळांच्या परिसरापर्यंत, बाजारपेठांपासून सार्वजनिक स्थळांपर्यंत युवकांनी झाडू हाती घेत स्वच्छता सेवा केली. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी सुद्धा या कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.

 मंत्री श्री लोढा म्हणाले की पंतप्रधानांच्या अमृतमहोत्सवी जन्मदिनानिमित्त महाराष्ट्रातील युवकांनी स्वच्छ भारताच्या संकल्पनेसाठी घेतलेला पुढाकार अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नेहमी सांगतात की स्वच्छता केवळ एका दिवसासाठी नाही तर ती आपल्या दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असावी. मला विश्वास आहे की आज स्वच्छता अभियानात सहभागी झालेली तरुण पिढी स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देईल आणि स्वच्छ भारतासाठी नेहमीच प्रयत्न करेल.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश आम्ही जनमानसात रुजवला. पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त केलेली स्वच्छता सेवा अभूतपूर्व ठरेल.

संबंधित पोस्ट

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना मिळणार; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री यांची मंजुरी

महाराष्ट्राच्या रूपाली कदम यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांमध्ये शासनाबाबत विश्वासनिर्मिती- कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा· महसूल विभागाचा अभिनव उपक्रम

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम; प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी दर सोमवार व शुक्रवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

vishwatmaklokswamivarta

काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) यांच्या1 फेब्रुवारी 2025 पासून भाडेदरात वाढ सुरु..

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय-मराठा समाजाला ओबीसीप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती मिळतील  .