vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

रामनगर येथे दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळा उत्साहात संपन्न*

राज्य प्रतिनिधी –

रामनगर (ता. जालना) — रामनगर येथील ओम मंगल कार्यालयात श्री. शिवादादा शेजुळ यांच्या पुढाकाराने आज दि 26 ऑक्टोबर रोजी दीपावली व पाडवा स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला

यावेळी माजी आमदार कैलाशजी गोरंट्याल, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उत्तम अण्णा शेजुळ, ह.भ.प. गणेश महाराज कोल्हे, ह.भ.प. कैलाश महाराज ठोंबरे, तुकाराम पाटील शेजुळ, प्रभाकर शेजुळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, सरचिटणीस सुनील पवार, तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, विष्णुबापू डोंगरे, कैलाश उबाळे, दिलीपराव मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभल

माजी आमदार श्री. कैलाशजी गोरंट्याल म्हणाले “सण-उत्सव ही आपल्या सामाजिक जीवनाची ताकद आहे. अशा स्नेहमिलनातून आपला भावनिक बंध दृढ होतो. समाजातील प्रत्येक घटकाने एकात्मतेची भावना जपत विकासाच्या वाटचालीत हातभार लावला पाहिजे. रामनगर येथे शिवादादा शेजुळ यांनी आयोजित केलेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे.”

भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले शिवादादा शेजुळ यांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे तसेच “दीपावली म्हणजे प्रकाशाचा उत्सव. हा प्रकाश फक्त दिव्यांमध्ये नसून मनामनात पसरला पाहिजे. आपण सर्वांनी एकमेकांना साथ देत समाज विकासासाठी कटिबद्ध राहिले तर विकास अधिक वेगाने होईल. सर्वांना दीपावली व पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.यावेळी रामनगर व परिसरातील बंधू भगिनी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

vishwatmaklokswamivarta

सोन्याच्या तस्करीप्रकरणी मुंबई सीमाशु्ल्क विभागाने दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक केली

तिबेटमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात 95 जणांचा मृत्यू झाला आहे. शेजारच्या नेपाळ, भूतान आणि भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले

सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी पक्षात संधी देऊ-अरविंद चव्हाण  मोदीखाना भागातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ