vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

जालना, प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्वाचेअसल्याचे प्रतिपादन शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी केले.जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथे दलित आदिवासी मेळावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुखअ‍ॅड. भास्कर मगरे बोलताना म्हणाले, दलित आदिवासी जाती-जमातीचे मूलभूतप्रश्नावर शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे. दलित आदिवासी सोबतच गावगाड्यातील अनेकसमस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न जालना जिल्हा शिवसंपर्क सामाजिक अभियानातून सोडविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. दलित आदिवासी,भूमिहीन कास्तपट्टे प्रलंबित प्रश्न, गावगाड्यातील घरकुले प्रश्नजागेविना अनेक लाभार्थी वंचित आहेत.सर्वांसाठी घरे-२०२२-२४ अधिनियमानुसार मागेल त्याला घर आणि राहील तिथे घरलाभार्थी गावठाणमध्ये राहत असेल तर गावठाण ८ अ उत्तरेला नोंद घेऊन समोरठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावे तसेच गायरानात रहात असेल तर२०११ पूर्वीचा पुरावासमोर ठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावेअसे सर्वांसाठी घरे ग्रामीण २०२२-२४ मध्ये नमूद असताना प्रशासकीय यंत्रणाया अधिनियमाचे अंमलबजावणी करत नाहीत अंमलबजावणी केल्यास उपेक्षितसमाजातील एक ही लाभार्थीघरकुलापासून वंचित राहणार नाही.पुढे मगरे म्हणाले की, त्याचप्रमाणे निराधाराचा निराधाराच्या मासिक देअनुदानात दीड हजार ऐवजी तीन हजार रुपये केल्यास निराधार चांगल्याbपद्धतीने जगू शकतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तरुणांमध्ये बेकारीचेप्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तेव्हा शासकीय आर्थिक विकास

महामंडळाकडून उदाहरणार्थ महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीरअण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ या व इतर महामंडळाकडून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज वितरण ग्रामीण,भागातील तरुण बेरोजगारीला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने शिवसंपर्क सामाजिक अभियानामार्फत व लोकआंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे आणि म्हणूनजनतेचे जीवनमान सुधारणारे प्रश्नाचे सोडवणूक झाली पाहिजे म्हणून यासाठीराजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, असेही अ‍ॅड. मगरे म्हणाले.याप्रसंगी जय खरात,अण्णासाहेब बाळराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण प्राप्त करुन समाजामध्ये मानाचे स्थान मिळवावे- न्या. श्रीमती. आर.एस. पाटील

परमवीर चक्र विजेत्यांना समर्पित असलेले पहिले उद्यान अत्याधुनिक सुविधायुक्त मासळी बाजाराचे भूमिपूजन-विकासासोबतच संस्कृतीच्या संवर्धनाला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘वंदे मातरम्‌’ उद्यानाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’प्रचाराचा शेवटचा दिवस. 

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अकोला इथं भव्य सामूहिक गायन सोहळा पार पडला. 

vishwatmaklokswamivarta