vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्त्वाचे-दलित आघाडी जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

जालना, प्रतिनिधी)- राजकारणापेक्षा माझ्यासाठी समाजकारण महत्वाचेअसल्याचे प्रतिपादन शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी केले.जालना तालुक्यातील वाघ्रुळ येथे दलित आदिवासी मेळावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुखअ‍ॅड. भास्कर मगरे बोलताना म्हणाले, दलित आदिवासी जाती-जमातीचे मूलभूतप्रश्नावर शिवसेना दलित आघाडीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे. दलित आदिवासी सोबतच गावगाड्यातील अनेकसमस्या आहेत. त्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न जालना जिल्हा शिवसंपर्क सामाजिक अभियानातून सोडविण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आहेत. दलित आदिवासी,भूमिहीन कास्तपट्टे प्रलंबित प्रश्न, गावगाड्यातील घरकुले प्रश्नजागेविना अनेक लाभार्थी वंचित आहेत.सर्वांसाठी घरे-२०२२-२४ अधिनियमानुसार मागेल त्याला घर आणि राहील तिथे घरलाभार्थी गावठाणमध्ये राहत असेल तर गावठाण ८ अ उत्तरेला नोंद घेऊन समोरठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावे तसेच गायरानात रहात असेल तर२०११ पूर्वीचा पुरावासमोर ठेवून त्या लाभार्थ्याला घरकुल देण्यात यावेअसे सर्वांसाठी घरे ग्रामीण २०२२-२४ मध्ये नमूद असताना प्रशासकीय यंत्रणाया अधिनियमाचे अंमलबजावणी करत नाहीत अंमलबजावणी केल्यास उपेक्षितसमाजातील एक ही लाभार्थीघरकुलापासून वंचित राहणार नाही.पुढे मगरे म्हणाले की, त्याचप्रमाणे निराधाराचा निराधाराच्या मासिक देअनुदानात दीड हजार ऐवजी तीन हजार रुपये केल्यास निराधार चांगल्याbपद्धतीने जगू शकतील. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तरुणांमध्ये बेकारीचेप्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तेव्हा शासकीय आर्थिक विकास

महामंडळाकडून उदाहरणार्थ महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीरअण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास महामंडळ या व इतर महामंडळाकडून ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना कर्ज वितरण ग्रामीण,भागातील तरुण बेरोजगारीला हातभार लागल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून

शिवसेना दलित आघाडीच्या वतीने शिवसंपर्क सामाजिक अभियानामार्फत व लोकआंदोलनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केल्या जात आहे आणि म्हणूनजनतेचे जीवनमान सुधारणारे प्रश्नाचे सोडवणूक झाली पाहिजे म्हणून यासाठीराजकारणापेक्षा समाजकारण महत्त्वाचे आहे, असेही अ‍ॅड. मगरे म्हणाले.याप्रसंगी जय खरात,अण्णासाहेब बाळराज यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा-2025उमेदवारांनी/परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये…

सोलापूर बसस्थानाकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित!

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते;मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta