vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

हंगामानुसार शिफारस केलेल्या बियाण्यांची विक्री करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र संचालकांनी बियाणे कायद्याचे पालन करून केवळ त्या-त्या हंगामासाठी शिफारस केलेल्या बियाण्यांचीच विक्री करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

  खरीप, रब्बी किंवा इतर विशिष्ट हंगामासाठी शिफारस केलेले बियाणे केवळ त्या शिफारस केलेल्या हंगामातच विक्रीसाठी ठेवावे. हंगामाबाह्य बियाण्यांची विक्री पूर्णपणे टाळावी. खरीप किंवा लेट खरीप हंगामासाठी शिफारस केलेले कांदा (Onion) किंवा इतर बियाणे रब्बी हंगामात विक्रीस ठेवू नयेत. त्याचप्रमाणे, रब्बी हंगामासाठी शिफारस केलेले मका (Maize) किंवा ज्वारी (Jowar/Sorghum) बियाणे रब्बी हंगाम संपल्यानंतर विक्रीस ठेवू नयेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

कृषी केंद्र संचालकांनी हंगामबाह्य बियाणे विक्रीसाठी कंपन्यांकडून खरेदी करणे तात्काळ थांबवावे. शेतकऱ्यांनी अशा बियाण्यांची खरेदी केल्यामुळे नुकसान झाल्यास संबंधित कृषी केंद्र संचालक यांना जबाबदार धरले जाईल. त्यांच्या विरोधात बियाणे कायद्यानुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य हंगामात योग्य बियाणे उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी ही सूचना जारी करण्यात आली असून सर्व कृषी केंद्र संचालकांनी या सूचनेची अंमलबजावणी त्वरित व काटेकोरपणे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

दादर येथील महाराष्ट्र बाजारपेठ या नामांकित व्यवसायाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त डॉ ओमप्रकाशजी शेटेआयुष्यमान भारत-मिशन महाराष्ट्र समित यांच🔸महाराष्ट्र गुणगौरव ने सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देताना निर्धार*

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाने मराठा आरक्षण प्रश्नावर कोणतीही काळजी करू नये. हे सरकार मतासाठी नाही तर जनतेच्या हितासाठी काम करत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. अशी घोषणा मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील धारावी ते माहीममध्ये एकही नवा रुग्ण नाही….

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन…मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगर येथे भारतीय नौदलातील नौसैनिकांसाठी मतदार जागरूकता अभियान

vishwatmaklokswamivarta