vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

*सातारा व दहिवडी येथील सरदार @ १५० युनिटी मार्च पदयात्रेमध्ये नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन*

 

सातारा, प्रतिनिधी: युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्फत २०२५ हे वर्ष भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रमुख शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे, या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर २०२५ दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित केल्या जात आहेत. या उपक्रमात शाळा, महाविद्यालये, स्थानिक युवा संघटना, माय भारत, एनएसएस, एनसीसी स्वयंसेवक आणि बीएसजी युनिट्स यांची सहभागिता आहे. सातारा शहरातील पदयात्रेचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता गांधी मैदान, राजवाडा येथे जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करून होणार आहे. पदयात्रेचा मार्ग गांधी मैदान, राजवाडा सुरु होऊन छ. शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा येथे समाप्त होणार आहे. पदयात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे.

दहिवडी शहरामध्ये पदयात्रेचा दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता दहिवडी कॉलेज दहिवडी परिसरातून शुभारंभ होऊन छ. शिवाजी महाराज चौक मार्गे – महात्मा गांधी विद्यालय समोरून बाजार पटांगण – गणेश मंदिर – सिद्धनाथ मंदिर परिसरापासून आलेल्या मार्गाने दहिवडी कॉलेज दहिवडी येथे समारोप होणार आहे. या उपक्रमाचा उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि देशभक्तीची भावना निर्माण करणे असा आहे. , शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहभागाने भविष्यातील भारताच्या निर्मितीत तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, नृत्य आणि प्रेरणादायी भाषणे या माध्यमातून देशभावना जोपासली जाईल. भविष्याला दिशा देणाऱ्या या पदयात्रेत तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विविध शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था, पोलिस कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी https://mybharat.gov.in/unity_march_registration/457137608457 संकेतस्थळ यावर खुली आहे.

0000

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना. भाजपच्या स्थानिक नेत्याची त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या…

नागरी भागातील बालाकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त- मंत्री आदिती तटकरे,सुपोषित मुंबई अभियान व नागरी बाल विकास केंद्र योजनेचा शुभारंभ…

vishwatmaklokswamivarta

फॅन्टसी किडस् झोन शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन

vishwatmaklokswamivarta

महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त उदयनराजे भोसले, राजन साळवी, चंद्रकांत पाटील, आदी मान्यवरांनी सोशल मीडियाद्वारे केलं अभिवादन

vishwatmaklokswamivarta

१४० किलोमीटर समुद्र किनाऱ्याच्या सरंक्षणाची जबाबदारी रत्नागिरीकरांची – पालकमंत्री डॉ. उदय सामंत सुरक्षित तटम् समृद्ध भारत ; सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन

vishwatmaklokswamivarta

मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी- हवामान खात्याकडून कडून यलो अलर्ट जारी…