जालन्यातील रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह शिष्टमंडळाचे मनपा प्रशासनाकडे निवेदन सादर
जालना/प्रतिनिधी-जालना शहरातील सर्वच रस्त्याच्या दुभाजकमधील झाडेझुडपे छाटून साफसफाई करावी, जेणे करून, रस्त्यावर अपघात होणार नाही, या मागणीचे निवेदन इंजि. श्रीपाद रत्नपारखी यांच्यासह नितीन गायकवाड, अखिलेश काबलिये यांच्या शिष्टमंडळाने जालना शहर मनपा प्रशासनाकडे दिले आहे.
यासंदर्भात मनपाचे अति. आयुक्त अर्जुन गिराम यांनादिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल समोरील रोडवरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकामध्ये झाडेझुडपे वाढली आहे. तसेच शहराबाहेर अंबड चौफुली, मंठा चौफुली, नाव्हा चौफुली, भोकरदन नाका येथेही दुभाजकामध्ये मोठमोठी झाडी-झुडपे वाढली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास होत असून, यामुळे मोठा अपघात व दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहे. या कामासोबतच रस्त्याच्या दुभाजकमधील छोटी-छोटी झाडेझुडपे काढून घेण्यात यावे, व दुभाजकाला संरक्षण लोखंडी जाळी बसवून त्यामध्ये वृक्षारोपण करावे अशी मागणी केली आहे.