vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी31 डिसेंबरपर्यंत मुदत

       अमरावती, प्रतिनिधी शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2023-24 या पाच वर्षांच्या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढण्याची सूचना समाज कल्याण विभागाने दिली आहे. महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेले हे अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर प्रलंबित राहणाऱ्या अर्जांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची असेल, असा कळविण्यात आले आहे.

      सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी-परीक्षा फी माफी, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती यांसारख्या विविध योजना राबविल्या जातात. मात्र, अनेक महाविद्यालयांनी वारंवार सूचना देऊनही जुन्या वर्षांचे अर्ज अद्याप निकाली काढलेले नाहीत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत केंद्र हिस्सा अदा करता येणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थी पात्र असूनही केवळ महाविद्यालयाच्या दिरंगाईमुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील, त्यांच्याकडून कोणतेही शुल्क वसूल करता येणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

     समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी आवाहन केले आहे की, महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांची त्रुटीपूर्तता करून घ्यावी. ज्या अर्जांची त्रुटीपूर्तता होणे शक्य नाही, ते अर्ज नियमानुसार ‘रिजेक्ट’ करावेत. सन 2024-25 आणि 2025-26 या शैक्षणिक वर्षांचे शंभर टक्के अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी महाविद्यालयातील सूचना फलक, व्हॉट्सॲप ग्रुप आणि ‘समान संधी केंद्रा’चा प्रभावी वापर करावा. मुदतीनंतर महाडीबीटी ॲडमिनकडून अर्ज ‘ऑटो रिजेक्ट’ झाल्यास त्याची जबाबदारी प्राचार्यांची निश्चित केली जाईल, असेही या कळविण्यात आले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

हिंदी व गणित विषयांकरिता मासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत,

vishwatmaklokswamivarta

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबईतील वरळी मध्ये मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलेला भरधाव गाडीची धडक, महिलेचा जागीच मृत्यू; चालक अटकेत

कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार – संतोष साळवी कृत्रिम बुद्धिमत्ता व मराठीतील वापरावर चर्चा

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आवर्तनाचे नियोजनआवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे जलसंपदामंत्री विखे पाटील यांचे निर्देश,कालवा सल्लागार समितीची सन 2024-25 (रब्बी व उन्हाळी हंगाम) बैठक