vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानस्थानिक बातम्या

पॅन – आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले नसेल, तर हे लवकर करा. यासाठी फक्त सात दिवस शिल्लक आहेत. ३१ डिसेंबरनंतर पॅन आणि आधार लिंक न करणाऱ्यांना १००० रुपये दंड आकारला जाईल. शिवाय, ज्यांचे पॅन-आधार लिंक नसेल, त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय देखील होऊ शकते. नियमांनुसार, पॅन आणि आधार लिंक करणे सर्वांसाठी अनिवार्य आहे. नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांना आधार-आधारित पडताळणी करणे आवश्यक आहे. ३१ डिसेंबरच्या मुदतीनंतर, ज्यांच्याकडे पॅन आणि आधार दोन्ही असूनही त्यांनी ते लिंक केलेले नाही, त्यांना विलंब शुल्क लागू होईल. दरम्यान, पॅन-आधार लिंक करण्यासाठी नियमांची यादीही जाहीर करण्यात आली आहे, त्यानुसारच तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. काय आहेत नियम आणि अंतिम मुदत?

  •  प्राप्तिकर विभागाने ३ एप्रिल २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्यांचे आधार-पॅन लिंक नसेल, त्यांचे पॅन या तारखेनंतर निष्क्रिय होईल.
  •  ज्यांना १ ऑक्टोबर २०२४ नंतर पॅन कार्ड वाटप करण्यात आले आहे, त्यांनाही या वर्षाच्या अखेरीस (३१ डिसेंबरपर्यंत) पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे.
  • पॅन आधारशी लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम मुदत ३१ मे २०२४ होती.
  • जर एखादी व्यक्ती ३१ डिसेंबर २०२५ रोजी पॅन आधारशी लिंक करत असेल, तर तिला १,००० रुपये दंड भरावा लागेल, कारण लिंक करण्याची मूळ तारीख आधीच उलटून गेली आहे.

जर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले, तर तुम्हाला खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते :  

  • प्राप्तिकर परतावा भरण्यात अडचण येईल.
  • परतावा अडकू शकतो.
  • नवीन पॅन मिळवण्यासाठी दीर्घ प्रक्रियेतून जावे लागेल.
  • अधिक दराने टीडीएस आणि टीसीएस भरावा लागू शकतो.
  • फॉर्म 26AS चा वापर करता येणार नाही.
  • टीसीएस/टीडीएस प्रमाणपत्रे उपलब्ध होणार नाहीत.
  • बँक खाते उघडता येणार नाही.
  • क्रेडिट/डेबिट कार्ड घेता येणार नाही.
  • बँकेत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख जमा करता येणार नाही.
  • १०,००० रुपयांपेक्षा जास्त बँक व्यवहार करता येणार नाहीत.
  • केव्हायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार नाही.
  • सरकारी सेवांपासून वंचित राहावे लागू शकते.
  • म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील गुंतवणूक थांबू शकते.

संबंधित पोस्ट

 रेल्वे प्रशानाचा अजब निर्णय; प्रतिसाद अन् नसतानाही एसी लोकलच्या फे-यांमध्ये वाढ..

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी कामगार, कर्मचाऱ्यांना-मतदानासाठी सवलत देऊन कर्तव्य बजावावे-जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांचे आवाहन  

vishwatmaklokswamivarta

मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक  यांनी पूर्वप्राथमिक ते इयत्ता 4 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी 9 वाजता सुरू होण्याची वेळ न पाळणाऱ्या शाळांना कारवाईचा इशारा..

vishwatmaklokswamivarta

वरळीच्या पोतदार हॉस्पिटल तर्फे धारावीत मोफत आयुर्वेदिक शिबिर संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात M-Sand धोरणाच्या अंमलबजावणी व प्रसिद्धीबाबतऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन

पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी ‘महा इनविट’ संस्थेची स्थापना इनविट स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य..