vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

नांदेड प्रतिनिधी :- राज्यात वाळू तसेच इतर गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, साठवणूक व बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी शासनाने कडक धोरण राबविण्याचे अनुषंगाने महसूल व वन विभागाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी परिपत्रक प्रसिध्द केले आहे. या निर्देशानुसार परिवहन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून संयुक्त तपासणी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ज्यामध्ये बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या वाहनांवर मोटार वाहन अधिनियम 1988 अंतर्गत कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. अवैध वाहतूकीमध्ये संबंधित वाहनाकडून पहिल्यांदा गुन्हा आढळून आल्यास वाहनाचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. दुसऱ्यांदा गुन्हा सिद्ध झाल्यास 60 दिवसांसाठी परवाना निलंबित करून वाहन जप्त करण्यात येईल. तिसऱ्यांदा किंवा वारंवार गुन्हा आढळल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणामार्फत कार्यवाही करुन परिवहन विभागामार्फत कारवाई पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 (7) व 48 (8) अन्वये दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईसाठी परिवहन विभागाकडून संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्हयातील वाळू माफिया व बेकायदेशीर खनिज वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास तसेच शासनाच्या महसुलाचे संरक्षण होण्यास हातभार लागणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरची बनवणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

बिहार पोलिसांच्या गाडीला भीषण अपघात त्यात लागलेल्या तिघांचा होरपळून मृत्यू….

छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसान भरपाई अनुदानअनियमितता प्रकरणी चौकशी सुरू- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

इंदुमिल मधील स्मारकात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील सर्वाधिक उंच पुतळा उभा राहणार त्याप्रमाणे चैत्यभूमी चा स्तूप ही दीक्षाभूमी सारखा भव्य उभारण्यात यावा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले 

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय टायगर दिन निमित्त पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयानं काही दूरदृष्टीपूर्ण उपक्रमांची घोषणा केली.वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; त्याच्या ताकदीच्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी.

vishwatmaklokswamivarta