vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

नांदेड प्रतिनिधी नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूतपाटी ते जांभरुनफाटा दरम्यानचा रस्ता येत्या 2 ते 4 जानेवारी पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. यासाठी पर्यायी मार्ग जाण्या-येण्यासाठी नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा दरम्यानचा रस्त्याच्यापलिकडे एकेरी मार्ग असा राहील.

मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबधीत विभागाने पुढील उपाययोजना करुन 2 जानेवारी 2026 रोजीचे 6 वा. पासून ते 4 जानेवारी 2026 रोजीच्या 10 वा. पर्यंत उक्त नमुद केल्याप्रमाणे नांदेड ते हिंगोली जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खडकूत पाटी ते जांभरुन फाटा या दरम्यानची सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पलिकडच्या एकेरी मार्गाने वळविण्यास अधिसुचनेद्वारे मान्यता दिली आहे.

 

पोलीस अधिक्षक नांदेड यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी प्रस्तुत अधिसुचना प्रचार व प्रसारसाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण /कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड/ प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पीआययू नांदेड यांनी रस्ता वाहतूक प्रतिबंध व पर्यायी रस्त्यासाठी आवश्यक असलेले बोर्ड, चिन्ह लावणे इत्यादी बाबतची कार्यवाही करावी, असेही अधिसूचनेत नमूद केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

उद्योगांसाठी लवचिक उद्योग धोरण राबविणार-उद्योग मंत्री उदय सामंत*मोझरी चौथे पुस्तकाचे गाव साकारणार

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

मतदान टक्केवारी अहवाल प्रणालीत सुधारणा – भारत निवडणूक आयोग

विद्यार्थ्यांमुळेच समाज व देशाचा भविष्यकाळ उज्वल- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा केला गुणगौरव

जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले; मात्र शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवापालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची खरीप हंगामासाठी आयोजित बैठकीत विचारणाकोल्हापूर जिल्हा खरीप २०२६ साठी सज्ज; ३ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन..