vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

समृद्धी महामार्गावर गॅन्ट्री उभारणीसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद-७ ते २३ फेब्रुवारीदरम्यान वाशिम–बुलढाणा जिल्ह्यात ब्लॉक

 

बुलढाणा, प्रतिनिधी: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. हे काम वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील विविध टप्प्यांवर दि. ७ फेब्रुवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एकूण ३५ टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावरील कि.मी. १७८+९०० ते २९०+४०० दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड), मंगरुळपीर, मालेगाव तसेच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून जाणाऱ्या मार्गावर ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. या कामासाठी संबंधित वाहिनीवरील वाहतूक ४५ ते ६० मिनिटांसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून, काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक तत्काळ सुरू करण्यात येईल.

महामार्गावरील मुंबई व नागपूर दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर ठराविक वेळेत परिणाम होणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रवासाचे नियोजन करूनच मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :दि. ७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध तारखांना रात्री १२ ते १ वाजेपर्यंत तसेच दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत, मुंबई व नागपूर वाहिनीवर अनुक्रमे कि.मी. १७८.९००, १७९.७५०, १८३.७००, १८५.५००, १९०.४००, २००.४००, २०५.४००, २०८.२००, २०८.८५०, २३८.५५०, २४२.६००, २४५.४००, २५०.५००, २६०.४००, २६४.८००, २७०.४००, २८०.४००, २८१.४०० व २८३.९०० या ठिकाणी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिस, महामार्ग प्रशासन व सूचना फलकांचे पालन करावे, असेही महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू…

जिल्ह्यात २८ शहीद स्मारके उभारणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील शूरवीराच्या शौर्याचा गौरव: पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा,शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरिता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लावा ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश • जनसंवाद कार्यक्रमात 110 हून अधिक निवेदने प्राप्त • महसूलमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

फलटण व कोरेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस रिक्त पदांची भरती

vishwatmaklokswamivarta