vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

“ नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

राज्य प्रतिनिधी-

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ मध्ये भारतीय जनता पक्षाला नवी मुंबईकरांनी भरभरून पाठिंबा देत अभूतपूर्व यश मिळवून दिले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी सुजाता सुरज पाटील व उपमहापौरपदासाठी दशरथ सीताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महापालिका सभागृहात भाजपच्या सक्षम नगरसेवकांची टीम आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पार पाडेल आणि पक्षाला अभिप्रेत असलेले लोकाभिमुख व विकासाभिमुख कार्य करून नवी मुंबईच्या प्रगतीला आणखी उंचीवर नेईल, असा ठाम विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी गणेश नाईक यांनी नवी मुंबईत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या या घवघवीत यशाचे श्रेय देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी व प्रभावी नेतृत्वाला, राज्यातील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम व निर्णयक्षम नेतृत्वाला तसेच संघटन कौशल्याने पक्ष अधिक मजबूत करणारे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना दिले.

या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची अभेद्य एकजूट आणि नवी मुंबईच्या हिताची कळकळ असलेल्या जागरूक नागरिकांचा पाठिंबा निर्णायक ठरला असून, त्याबद्दल त्यांनी सर्व नवी मुंबईकरांचे मनःपूर्वक आभार मानले.

यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की,नवी मुंबईच्या विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी लवकरच आजी-माजी ज्येष्ठ नगरसेवक, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन आगामी पाच वर्षांची विकासदिशा निश्चित करण्यात येईल. स्वच्छ नवी मुंबई, हरित नवी मुंबई, फेरीवाला-मुक्त नवी मुंबई तसेच शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय पुढील २० वर्षे मालमत्ता कर वाढवला जाणार नाही, हा दिलेला शब्द कायम ठेवण्यात येईल. लवकरच जनतेच्या विश्वासावर आधारित विकासाचा सविस्तर मसुदा तयार करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

00000

संबंधित पोस्ट

लोकशाही सुदृढ करण्याकरिता लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री मकरंद पाटील यांची तुकाराम अंभोरे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट..जिल्ह्याचे पालकमंत्री दर पंधरा दिवसात असणार जिल्ह्यात…

गुढीपाडवा निमित्त आकर्षक वाहन नोंदणी क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया जाहीर

परभणीसाठी उदयोन्मुख जिल्हा दर्जा, झोन-१ व डी+ श्रेणी मंजूर पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रयत्नांना यश

vishwatmaklokswamivarta

विमानतळ परिसरात लेझर, बीम लाईट्स वापरावर बंदी

डोंगराळे अत्याचार प्रकरण; पीडित कुटुंबास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta