vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

        छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत पुरस्कारांसाठी पात्र व इच्छुक व्यक्ती तसेच संबंधित समाजाच्या उत्थानासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून इच्छुक व पात्र संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावा,असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

पुरस्कारांची नावे याप्रमाणे-

१) महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार२) नटराज पुरस्कार३) विश्वकर्मा पुरस्कार४) क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार

अटी व शर्ती :१) अर्जदार व्यक्ती / संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.२) अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग व उल्लेखनीय स्वरुपाचे कार्य केलेले असावे.३)अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून शासन निर्णयात नमुद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.४) अपूर्ण, चुकीची माहिती असलेले अथवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत.

५) पुरस्काराबाबत अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.इच्छुक संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव शनिवार दि.२१ पर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. अर्जाचा नमुना, शासन निर्णयातील सविस्तर अटी व शर्ती तसेच अधिक माहिती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. पात्र व इच्छुक व्यक्ती व संस्थांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक दयानंद कोकरे यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरातील खडकपाडा परिसरात हळदी समारंभादरम्यान सुमारे २५ जणांना अन्नातून विषबाधा झाली.

vishwatmaklokswamivarta

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानांची दीक्षाभूमीला भेट

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्येकोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही- उद्योग मंत्री उदय सामंत

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी -मंत्री मंगलप्रभात लोढा§ जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार§ जनता दरबाराला उदंड प्रतिसाद, म्हाडा संक्रमण शिबिराचा प्रश्नही लवकरच सोडवणार.