vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन

जालना, प्रतिनिधी:- जालना पाटबंधारे विभागांतर्गत विविध प्रकल्पांतून अनेक ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. मात्र या योजनांकडून पाणीपट्टी भरण्याबाबत सातत्याने टाळाटाळ केली जात असल्याचे समोर आले आहे. सध्या विभागाची 4 कोटी 85 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी आहे. तरी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत योजनाधारकांनी सात दिवसांची अंतिम मुदतीत आपली थकबाकी जमा करावी, असे कार्यकारी अभियंता एस. बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील भाग 6, कलम 49 (ज) नुसार कारवाई केली जाणार आहे. यामध्ये केवळ पाणीपुरवठाच नव्हे, तर संबंधित योजनेचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद ठाणे यांनी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना  बुधवार २० रोजी सुट्टी, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापानाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक/माध्यमिक/खासगी अनुदानित/विना अनुदानित शाळांना आज बुधवार २० रोजी सुट्टी जाहीर

परिवहन संवर्गातील वाहनांकरिता 23 जूनपासून नवीन मालिका..

आमदार धिरज लिंगाडे यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 कोटी 10 लक्ष रुपयाचे शैक्षणिक साहित्याचे वाटपजिल्ह्यातील शाळेत यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाचे साहित्य दरवर्षी वाटप करु : आ. धिरज लिंगाडे

सिंधुदुर्गमधील अरुणा प्रकल्पांतर्गत मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २ हजार २५ कोटी…

स्वच्छता जनजागृती मोहीम — राजमाता जिजाऊ रुग्णालय, ऐरोली