vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना, प्रतिनिधी  जालना शहरातील सामानगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आता स्पष्ट झाले असून, हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाड दुपारी सुमारे 4:45 वाजता दुरुस्त करण्यात आला. तसेच वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असुन, सध्या परिसरात स्थिती पूर्णपणे सामान्य आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी असलेल्या 11 KV सॅटेलाइट फीडरच्या कंडक्टरचा संपर्क V-cross arm आणि RSJ पोलशी आला. हा संपर्क faulty pin insulator मुळे झाला आणि त्यामुळे विद्युत प्रवाह थेट पोलमार्फत जमिनीत उतरला (earthing). परिसरात खडकाळ (rocky) जमीन असल्यामुळे, या तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून लाव्ह्यासारखा दिसणारा पदार्थ बाहेर येताना दिसला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, हा प्रकार ज्वालामुखी किंवा नैसर्गिक आपत्ती नसून तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

**

संबंधित पोस्ट

किल्ले प्रतापगड येथील सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन देवू**- खासदार उदयनराजे भोसले*

vishwatmaklokswamivarta

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

बलात्कार प्रकरणातील दोषींना पॅरोल देण्यात येऊ नये; कायद्यात कडक तरतूद करण्याची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची मागणी

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री 

केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नवा टप्पा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta