vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना शहरातील राजपूतवाडी येथील जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येण्यामागील कारण स्पष्ट• नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

जालना, प्रतिनिधी  जालना शहरातील सामानगाव रोड परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आता स्पष्ट झाले असून, हा प्रकार कोणताही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचे समोर आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने महावितरण (MSEB) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार बिघाड दुपारी सुमारे 4:45 वाजता दुरुस्त करण्यात आला. तसेच वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असुन, सध्या परिसरात स्थिती पूर्णपणे सामान्य आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित ठिकाणी असलेल्या 11 KV सॅटेलाइट फीडरच्या कंडक्टरचा संपर्क V-cross arm आणि RSJ पोलशी आला. हा संपर्क faulty pin insulator मुळे झाला आणि त्यामुळे विद्युत प्रवाह थेट पोलमार्फत जमिनीत उतरला (earthing). परिसरात खडकाळ (rocky) जमीन असल्यामुळे, या तीव्र विद्युत प्रवाहामुळे खडक वितळून लाव्ह्यासारखा दिसणारा पदार्थ बाहेर येताना दिसला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली होती. तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की, हा प्रकार ज्वालामुखी किंवा नैसर्गिक आपत्ती नसून तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

**

संबंधित पोस्ट

१३५ वर्षांची शिक्षण परंपरा: अक्षीकर पुरस्कारांनी आदर्श शिक्षकांचा सन्मान”छबिलदास शाळा, दादर येथे जनरल एज्युकेशन सोसायटीचा १३५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा !

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित समता दिंडी, चित्ररथ उत्साहात संपन्न

मुंबईकरांची लाईफ  लाईन बेस्ट वाचवा मुंबई वाचवा आंदोलनाला ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा

vishwatmaklokswamivarta

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026: भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta