vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन

      मुंबई, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल 2026 या अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिथी संपादक डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते करण्यात आलेN

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव (मावज) अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्रधान सचिव तथा महासंचालक यांचे विशेष कार्यअधिकारी इर्शाद बागवान उपस्थित होते.‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या या अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राजशिष्टाचार उपविभागाचा विस्तार केल्यामुळे राज्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीला गती मिळणार आहे याची माहिती देण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या समकालीन विषयावरील लेखांच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञानातील नव्या घडामोडींची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या अंकात करण्यात आला आहे. शासन व्यवस्थेतील महसूली संकल्पना असो किंवा बदलत्या काळातील महिला आणि डिजिटल सुरक्षेचा प्रश्न असो अशा विविध विषयाची मांडणी या अंकात करण्यात आलेली आहे.

मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अंक प्रकाशित करण्यात येतो.

#आपल मंत्रालय

संबंधित पोस्ट

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी**वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा*- ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे*

लग्नाकडे विवेकी नजरेने पाहायला शिकवणारी संवादशाळा घाटकोपर येथे संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा-एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना  – अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर

डोंबिवली एमआयडीसीतील गारमेंट कंपनीत भीषण आग!

मतदान केंद्रांवर 11 व 12 एप्रिल रोजी विशेष मॅपिंग शिबिर;महापौरांचे नागरिकांना सहकार्याचे आवाहन

विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टपूर्तीत महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• महिलांच्या सहभागाने विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट गाठणे शक्य• राष्ट्रीय व राज्य महिला आयोगाच्यावतीने शक्ती संवादाचे आयोजन