vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ सुरू; 24 मेपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी डिजिटल क्रॉप सर्वे (DCS) प्रकल्पांतर्गत उन्हाळी हंगाम 2026 साठी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंदणी स्वतः अॅन्ड्रॉईड मोबाईलद्वारे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेची अंतिम मुदत 24 मे 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या 7/12 उताऱ्यावर पीक पेरा नोंदविण्यासाठी ‘ई-पीक पाहणी व्हर्जन 4.0.5’ या मोबाईल अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. हे अॅप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून शेतात जाऊन पिकांची माहिती नोंदवून अपलोड करावी लागणार आहे. अॅप सुरळीत चालण्यासाठी गुगल क्रोम अपडेट असणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध नाही किंवा अॅप वापरणे शक्य नाही, त्यांनी संबंधित गावाचे तलाठी, कोतवाल किंवा नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी. तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फतही ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत 100 टक्के ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगामात शेतात उभ्या असलेल्या पिकांसह कायम पड किंवा चालू पड जमिनींचीही नोंद करणे आवश्यक आहे. शेतकरी स्तरावर नोंदणी न झाल्यास, संबंधित जमिनींची नोंद सहाय्यक स्तरावरून पूर्ण करण्यात येणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे, वेळेत ई-पीक पाहणी न केल्यास 7/12 उताऱ्यावर पीक पेरा नोंद कोरी राहू शकते. यामुळे पीक विमा, शासकीय अनुदाने व इतर लाभ मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अचूक पीक नोंद आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व शेतकरी बांधवांनी अंतिम मुदतीपूर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महिलासक्षमीकरण-जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड खाटेघरच्या सविता गायकर यांनी फुलवला मशरूम शेतीतून यशाचा मळा..

गेवराई तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदाराचा काळ्या यादीत समावेश- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पोस्टाची नवीन पार्सल पॅकेजिंग सुविधा नागरिकांच्या सेवेत

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांच्या गरजेनुसार त्यांना योजनांचा लाभ द्यावा- राज्यमंत्री आशिष जयस्वाल,साधनसंपत्तीच्या स्त्रोतांचा अभ्यास करून त्यामध्ये वाढ करण्यासाठीच्या समितीची पहिली बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची अपघातग्रस्त युवकांच्या आरोग्याची विचारपूस, दिलासा आणि धीर