vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी : पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेअंतर्गत देशातील १८ ते २५ वर्षे वयोगटातील एक लाखाहून अधिक तरुणांन मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे. कोणत्याही ठिकाणी नोकरी करत नसलेल्या युवकांसाठी ही योजना असून या योजनेचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगाराची योग्य संधी उपलब्ध करून देणे हा आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारक्षम करण्यासाठी टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपचीसंधी मिळेल. या अंतर्गत युवकांना ६ ते ९ महिन्यांसाठी इंटर्नशिप मिळेल. या सोबतच त्यांना दरमहा ९००० रुपये विद्यावेतन मिळेल. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका किंवा पदवीधर अशा उमेदवारांनी इंटर्नशिप संधीसाठीनोंदणी योजनेच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी करावी. या http://pminternship.mca.gov.in पोर्टलवर प्रोफाईल तयार करून विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. उमेदवार अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त तीन इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. या योजनेअंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाते. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा येथे संपर्क करावा.

00000

संबंधित पोस्ट

पाणीपट्टी थकविणाऱ्या ग्रामपंचायतींना आवाहन 

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनानिमित्त संवाद ग्रंथपालांशी;ग्रंथपाल वाचन संस्कृतीचे खरे संवर्धक-डॉ.सुभाष चव्हाण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून  गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta