vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ पदभरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाची स्थगिती नाही; विद्यापीठ प्रशासनाचे स्पष्टीकरण

 

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर (MAFSU) द्वारे सुरू असलेल्या १७५ पदांच्या भरती प्रक्रियेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांकडून भरती प्रक्रियेबाबत विचारणा होत आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, विद्यापीठाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार ही भरती प्रक्रिया निरंतर सुरू आहे. या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशानुसार विद्यापीठाला ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार, केवळ १४ याचिकाकर्ते ज्या पदांवर सध्या कार्यरत आहेत, ती पदे वगळून उर्वरित सर्व पदांची भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.

या प्रकरणातील तांत्रिक बाबी स्पष्ट करताना विद्यापीठाने नमूद केले की, संबंधित याचिकाकर्ते हे बाह्य कंत्राटदारामार्फत पुरवण्यात आलेले मनुष्यबळ असून ते विद्यापीठाचे थेट कर्मचारी नाहीत, ही वस्तुस्थिती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी भरती प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम मनात न ठेवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा. भरतीबाबतची सर्व अद्ययावत माहिती विद्यापीठाच्या www.mafsu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

*****

संबंधित पोस्ट

.सात-बारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, फेरफार प्रक्रिया झाली गतिमान- जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या नेतृत्त्‌वाखाली महसूल विभागाची विशेष मोहीम- अधिकार अभिलेखात नावनोंदणी होणार जलद- शेतकरी, सामान्य नागरिकांच्या पैसे व वेळेत बचत

vishwatmaklokswamivarta

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील मृत पावलेल्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन जणांना डोंबिवलीत हजारो शोकाकुल नागरिकांनी भगशाला मैदानात एकत्रित येत अश्रूंच्या साक्षीने अखेरचा निरोप दिला.  

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शौर्य दाखवणारे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ तसेच गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी एनएसजी करणार सायक्लोथॉनचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

निवडणूक कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार – नवी मुंबई अंतर्गत शाळाप्रमुखांना अंतिम इशारा

नववर्षानिमित्त चिखलदरा येथील वनवे वाहतूक व्यवस्था दोन दिवस राहणार*पर्यटकांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

vishwatmaklokswamivarta