vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेशराजकारण

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..

राज्यात मॉडेल शासकीय सोलार जिल्हा स्पर्धेचे आयोजन- मंत्री अतुल सावे प्रथम विजेत्यास पाच लाखांचे बक्षीस..

मुंबई, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर, मुफ्त बिजली योजनेतंर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पाची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी ‘मॉडेल शासकीय सोलर जिल्हा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिली.

 राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर सौरऊर्जा प्रकल्पाची अमंलबजावणी होण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा विभागाने पुढाकार घेतला आहे. ज्या जिल्ह्यात जलद गतीने शासकीय इमारतींचे सौरीकरण करण्यात येईल, त्या जिल्ह्यास ‘मॉडेल शासकीय सोलार जिल्हा’ म्हणून घोषित केले जाईल. यासाठी स्पर्धा घेतली जाणार असून यात सहभाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील पत्र संबंधित जिल्हाधिकारी व महाव्यवस्थापक (महाऊर्जा) यांना प्रमाणित करून पाठवावे लागणार आहे.

महाऊर्जामार्फत पत्रांची छाननी केल्यानंतर ज्या जिल्ह्यात सर्वाधिक सौरऊर्जा प्रकल्प स्थापित होतील, अशा जिल्ह्यांना मॉडेल शासकीय जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येईल.

  दि. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येईल. प्रथम विजेत्यास पाच लाख रुपये, सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येईल. द्वितीय पारितोषिक ३ लाख तर तृतीय पारितोषिकासाठी १ लाख रुपये दिले जाणार आहेत. नागरी सेवा दिनी ( २१ एप्रिल २०२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.

या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यातअतिवृष्टीने १५ लाख हेक्टरवरील पिके पाण्याखाली! मदतीसाठी लवकरच पंचनामे

सोशल मीडियावर करडी नजर; आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांविरोधात होणार गुन्हा दाखल – पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे

vishwatmaklokswamivarta

दी सह्याद्री सहकारी बँकेच्या अध्यक्षांच्या तक्रारी संदर्भात चौकशी करून कार्यवाही– सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

आशियातील  सर्वात मोठी झोपडपट्टी वसाहत- धारावीची पुनर्रचना करण्याची बोली अदानी समूहा ने  जिंकली धारावी पुनर्विकास प्रकल्प; तब्बल 5,069 कोटी रुपयांची लावली बोली

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्ततिवसा येथे ‘युनिटी पदयात्रा’ संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला,4 राज्यातील 16 जागांसाठी चुरशीची स्पर्धा.

vishwatmaklokswamivarta