vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही ; शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी..

नांदेड प्रतिनिधी :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे.

फार्मर आयडी अनिवार्य,शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही.

अनुदानित खतांसाठी सक्ती,रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.

काळाबाजार व लिंकिंग थांबवणेखतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल.

 डिजिटल नोंदणी प्रणालीशेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल.

थेट लाभ हस्तांतरण (DBT)खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेफार्मर आयडी कसा काढावा ?ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय

महत्वाच्या सूचना-शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम 2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन उच्च न्यायालयात “न्याय देवते”च्या पुतळ्याचे अनावरण

केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या पात्र उमेदवारांना माहिती सादर करण्यासाठी २१ मार्चपर्यंतची मुदत; गुणपडताळणीही उपलब्ध

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.

vishwatmaklokswamivarta

रेवदंडा-साळाव पुलावरून २० टनांवरील अवजड वाहतुकीस बंदी-पुलाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांचे आदेश अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन