vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

शिराळ्याच्या पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी प्रयत्नशील- जिल्हाधिकारी अशोक काकडे

 सांगली, प्रतिनिधी : शिराळा तालुक्याची निसर्ग संपदा समृद्ध असून, याठिकाणी पर्यटनास मोठा वाव आहे. पर्यटन वाढवून स्थानिकांच्या हाताला काम देण्याच्या दृष्टीने रोजगारवृद्धीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.

 शिराळा तालुक्याच्या पर्यटनवाढीच्या अनुषंगाने शिराळा येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, चांदोली वन्यजीवच्या प्रकल्प उपसंचालक स्नेहलता पाटील, तहसीलदार शामला खोत पाटील, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, अमित भिसे, उपविभागीय अभियंता बाबासाहेब पाटील, ऋषिकेश पाटील, सुदामा कुंभार आदि उपस्थित होते.बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी काकडे यांनी चांदोली व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण, शिराळा येथील भुईकोट किल्ला याची पाहणी केली. यावेळी महसूल, वनविभाग, पाटबंधारे विभाग आदि विभागांचे अधिकारी सोबत होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, शिराळ्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी शासन व खाजगी उद्योजक यांच्या एकत्रित गुंतवणुकीतून तीन वर्षात कोणत्या प्रकारे ही काम करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येईल. याचबरोबर स्थानिक नागरिकांचा आर्थिकस्तर वाढविण्यासाठी पर्यटनस्थळ विकास करताना चांदोली परिसरातील ३० – ४० गावांचा समावेश करून एकत्रित विकास साधता येईल. यामधे निवास व न्याहरी, मध प्रकल्प आदि सुविधा उपलब्ध करून देता येतील. स्थानिक उत्पादनांची विक्रीही या माध्यमातून करता येईल. मुलांच्या शैक्षणिक सहली आयोजित केल्यास त्यांनाही येथील वनस्पती, प्राणी, राहणीमान, कौटुंबिक प्रेम आदिंबाबत माहिती होईल. पर्यटकांना वन्यप्राणी यांचे आकर्षण वाढेल, असे ते म्हणाले.

00000

संबंधित पोस्ट

तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद ७४२ सातबारा व ५१२ आठ-अ उताऱ्यांचे वाटप; ४५ जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

vishwatmaklokswamivarta

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहावे – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

vishwatmaklokswamivarta

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अचलपूर आणि परिसरातील १०५ गावांसाठीवाढीव पाणीपुरवठा योजनेस गती देण्यात येणार- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील