vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

कौशल्य विकास विभागातर्फे निबंध स्पर्धा

    अमरावती, प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर याच्या विचाराचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

    डॉ. बाबासाहेब आबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य, महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर निबंध स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खासगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतील. निबंधाच्या विषयासाठी विद्यार्थ्यांना ५०० ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

     दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतील. या गटाला ८०० ते १ हजार २०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी दि. १४ एप्रिल ते दि. २५ एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमाकावर संपर्क करू शकतील. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

पायाभूत सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उभाराव्यात – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पर्यटन संचालनालयाच्या नवीन योजनांमुळे देश-विदेशी पर्यटकांना आता शहरातही मिळणार “टुरीस्ट होम”

फणसावरील संशोधनासाठी कृषी विद्यापीठांतर्गत केंद्र स्थापन करण्यात येईल- कृषिमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत सदस्यांच्या भावना विचारात घेऊनबैठक घेण्याचे सभापतींचे निर्देश..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

जैन समाजभवन व साधुसंतांसाठी निवाऱ्याची आवश्यकता- ललीत गांधी अल्पसंख्याक कल्याण योजनांचा आढावाजैन व्यापाऱ्यांनी उद्योग-व्यवसायात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन..

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक खर्चाची काटेकोरपणे तपासणी करा – जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया ,खर्च निरीक्षक व्ही. कुमार यांच्याकडून पूर्वतयारीचा आढावा ; दैनंदिन अहवाल वेळेत सादर करण्याचे निर्देश उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये ; सर्व पथकांच्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा