भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य प्रतिनिधी-भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्राने नवा टप्पा गाठला आहे. वाराणसी येथून देशातील पहिल्या हब-अँड-स्पोक आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या ‘ईझी कनेक्ट’ सेवेमुळे प्रवाशांना त्यांच्या मूळ विमानतळावरच चेक-इन, इमिग्रेशन आणि सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर दिल्ली, मुंबई किंवा बेंगळुरू यांसारख्या प्रमुख हब विमानतळांमार्गे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
या उपक्रमामुळे ट्रान्झिट हबवर पुन्हा इमिग्रेशन आणि सीमाशुल्क तपासणीची गरज राहणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक जलद, सुरळीत आणि सोयीस्कर होणार आहे.