vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा 

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

 

 सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशा पद्धतीने पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कतेने व प्रभावीपणे काम करावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणांचे जाळे मजबूत करून त्याचा प्रभावी वापर करावा आणि नागरिकांशी समन्वय वाढवून गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सूचित केले.

 गुंडाविरोधी पथक स्थापन केल्याबाबत समाधान व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पोलीस दलाने विविध अद्ययावत यंत्रणा व उपकरणांची मदत घ्यावी. नियमित शस्त्र तपासणी करावी. गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना तातडीने अटक करून दोषारोपपत्र वेळेत दाखल करावे, गंभीर गुन्ह्यांतील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे दोषारोपपत्र प्रक्रिया गतीने करावी. तसेच सराईत गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शस्त्र परवान्यांचा आढावा घेऊन आवश्यकता असेल तरच शस्त्र परवाने द्यावेत, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. तसेच, आगामी काळात व्यापक स्तरावर अमली पदार्थ विरोधी पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारीची सद्यस्थिती, गंभीर गुन्ह्यांचा तपास, गुन्हेगारांवरील प्रतिबंधात्मक कारवाई, अमली पदार्थ विरोधी मोहीम, संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण, महिलांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणारे उपाय, रात्रीची गस्त, संवेदनशील भागांतील पोलीस बंदोबस्त तसेच सोशल मीडियावरील अफवांवर नियंत्रण याचा सविस्तर आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ मार्च रोजी वितरण

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयगोंडवाना विद्यापीठाच्या चंद्रपूर उपकेंद्रासाठी ४१४ कोटी ७४ लाखांचा निधी मंजूर,आ. मुनगंटीवार यांच्या मागणीची तंत्र व शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ घेतली दखल

स्मार्ट’ अंतर्गत नोंदणीकृत प्रकल्प कालबद्धरितीने पूर्ण करावेत- कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

23 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी केले भारतीय कुस्तीपटूंचे अभिनंदन

एफएसएसएआयचा उपक्रम; खाद्य पदार्थ विक्रेत्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षण-केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा  –जिल्हाधिकारी किशन जावळे प्रशासन गाव की ओर सुशासन सप्ताह जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न…

vishwatmaklokswamivarta