vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

*कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

नवी मुंबई प्रतिनिधी :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) या रिक्त पदावर सरळ सेवेने नवनियुक्त झालेले संजू उत्तम चव्हाण यांनी मंगळवारी आपल्या पदाचा कार्यभार अधिकृतपणे स्वीकारला आहे. नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील कोकण भवनमधील विभागीय माहिती कार्यालयातील उपसंचालकांच्या दालनात एका छोटेखानी आणि उत्साही कार्यक्रमात हा पदभार सोहळा संपन्न झाला. आतापर्यंत या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार ठाणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्याकडे होता. त्यांनी अत्यंत यशस्वीपणे ही जबाबदारी सांभाळत आज नवनियुक्त उपसंचालक श्री. चव्हाण यांच्याकडे या पदाची अधिकृत सूत्रे सुपूर्द केली आणि त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले.

या सोहळ्याप्रसंगी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांच्यासह विभागीय माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय कोकण विभागांतर्गत येणाऱ्या ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी येथील जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डिजिटल माध्यमातून म्हणजेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

संबंधित पोस्ट

नागपुरात दंगल करणाऱ्या दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

स्मशानभूमी समस्या निवारण अभियान मे अखेर जिल्ह्यातील स्मशानभूमी समस्यामुक्त करण्याचा निर्धार..

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा सहकारी बँकेला आता शक्तीशाली जोड – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक 2025 टप्पा-1: ऐतिहासिक 64.66% मतदान निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांमुळे मतदारांसाठी मतदान हा सर्वात आनंददायी अनुभव बनला

vishwatmaklokswamivarta