vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

शोषितांच्या हक्कासाठी अण्णाभाऊंचे विचार प्रेरणादायी: सतीशराव घाटगे,अंतरवाली टेंभी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा उत्साहात..

घनसावंगी प्रतिनिधी: शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीच्या आणि शाहिरीच्या माध्यमातून आवाज देणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त धनंजय आप्पा कोल्हे मित्र मंडळ व अंतरवाली टेंभी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमास समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतीशराव घाटगे, आझाद क्रांती सेनेचे प्रमुख श्री. राजेशभाऊ घोडे, श्री. धनंजय आप्पा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच उपस्थित समाजबांधवांशी संवाद साधला. यावेळी शाळकरी विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आपल्या भाषणातून जागर केला.

यावेळी सतीश घाटगे यांनी आपल्या भाषणात अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांच्या व्यथा मांडतानाच, स्वाभिमान, समता आणि परिवर्तनाची ज्वाला पेटवली. त्यांचे विचार केवळ इतिहासाचा भाग नसून, आजही सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या शोषित घटकांना त्यांचा हक्क मिळवण्यासाठी आणि समानतेच्या वाटचालीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे यांच्या परिवर्तनवादी विचारांचा वारसा जपत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास आणि न्याय पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया. वंचित, शोषित घटकांच्या न्याय आणि हक्काच्या लढ्यात मी कायम सोबत राहीन, असा विश्वास त्यांनी दिला.

या कार्यक्रमांसाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री धनंजय कोल्हे, जावेद शेख, भाजपा कार्यकर्ते संदीप शर्मा, पांडुरंग पाटोळे, काकासाहेब नळगे, साहेबराव कांबळे यांच्यासह धनंजय आप्पा कोल्हे मित्र मंडळाच्या सदस्त्यानी परिश्रम घेतले.

या जयंती उत्सव सोहळ्यासआझाद क्रांती सेनेचे प्रमुख श्री. राजेशभाऊ घोडे, श्री. धनंजय आप्पा कोल्हे, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष माधव टेहळे, समृद्धी साखर कारखान्याचे संचालक रंजित उढाण, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील तरुण मित्र व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

विद्यापीठांनी ‘स्कूल – कनेक्ट’ व महिला सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिद्धा’ उपक्रम कसोशीने राबवावेत – राज्यपाल जिष्णु देव वर्मा अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल लोकभवन येथे पाठवण्याची सूचना

जम्मू-काश्मीरमध्ये उर्दू लादण्याचा कट आम्ही चालवून घेणार नाही!” असा ठाम इशारा डोगरा समाजाने  दिला.

जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवूनच विकास कामे करावीत- मंत्री योगेश कदम

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

खते, बियाणे, कीटकनाशकांची तपासणी करा-अनियमितता आढळल्यास कायदेशीर कारवाई कर     – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी ५ कोटी ६२ लाख‌ रुपये खर्चाचा आराखडा तयार १ हजार १६ गावे, वाड्यांचा आराखड्यात समावेश 

vishwatmaklokswamivarta