vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन

निसर्गपुत्रांच्या अंगणात विकासाची नवी पहाट; पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम पोडावर साजरा केला जागतिक आदिवासी दिन

यवतमाळ, प्रतिनिधी: जल, जंगल आणि जमिनीशी एकरूप झालेली संस्कृती, निसर्गालाच दैवत मानणारा निगर्वी भाव आणि खडतर जगण्यातही जपलेली स्वाभिमानाची परंपरा, अशा आदिम संस्कृतीचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे जागतिक आदिवासी दिन. या औचित्यावर केवळ औपचारिकता न पाळता, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज, रविवारी बाभूळगाव गावात पोहोचताच मोरपिसांचा पारंपरिक टोप परिधान करून पालकमंत्र्यांनी आदिवासी बांधवांसोबत ढोलाच्या तालावर फेर धरला. यावेळी सत्ता आणि जनतेमधील अंतर दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पोडावरील चावडीवर आदिवासी दैवतांचे दर्शन घेत त्यांनी भगवान बिरसा मुंडा, क्रांतिवीर शामादादा कोलाम, राणी दुर्गावती आणि वीर बापुराव शेडमाके यांसारख्या महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन केले. आपली बोलीभाषा, जल-जंगलावर आधारित जीवनशैली आणि निसर्गपूजक परंपरा ही मानवी संस्कृतीची खरी मुळे आहेत. तरुणांनी आपल्या कोलामी भाषेचा अभिमान बाळगत आधुनिक जगाशी स्पर्धा करण्यासाठी मराठी व इंग्रजी भाषेचे प्रभुत्वही मिळवावे, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.

चावडीवर भरला जनता दरबार; प्रशासनाला थेट कृतीचे आदेशतालुक्यातील पिंपरी ईजारा येथील इंदिरानगर कोलाम पोडावर जाऊन संपूर्ण दिवस आदिवासी बांधवांसोबत व्यतीत केला. शासकीय प्रोटोकॉल बाजूला ठेवून जमिनीवर बसून केलेला हा संवाद वंचित घटकाला आत्मसन्मानाची जाणीव करून देणारा आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारा संवेदनशील उपक्रम ठरला.पालकमंत्र्यांनी चावडीवर गावकऱ्यांसोबत खाली बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. कोलाम समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील प्रलंबित प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता, उपस्थित अधिकाऱ्यांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश दिले. गावात सुसज्ज अभ्यासिका, वाचनालय आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी थेट बससेवा सुरू करणे, उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रे, सामाजिक सभागृह, सांस्कृतिक भवन आणि स्मशानभूमी उभारणीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. महिला बचत गट आणि ग्रामसंघांना आर्थिक मदत देऊन स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायाला चालना देण्याची ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी पोडावरील समस्यांच्या पाठपुराव्यासाठी विशेष स्वीय सहायकाची नियुक्ती करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास तहसीलदार मीरा पागोरे यांच्यासह पराग पिंगळे, हरिहर लिंगनवार, राजुदास जाधव, गजानन डोमाळे, यशवंत पवार, संजय हातगावकर, प्रद्युम्न जवळकर, आकाश राठोड, संजय रंगे, सचिन महल्ले, नितीन पखाले, लोकेश इंगोले, दर्शना इंगोले आदींसह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप गाडे यांनी केले, तर संचालन सुरेश चिंचोळकर यांनी केले.

संबंधित पोस्ट

उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक.

vishwatmaklokswamivarta

पानसरे हत्याप्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठ डॉ. तावडे, अमोल काळे व शरद कळसकर यांना जामीन! निरपराध हिंदुत्वनिष्ठांची साडे नऊ वर्षांची भरपाई कोण करणार?– सनातन संस्थेचा सवाल…   

vishwatmaklokswamivarta

राजा रघुवंशी हत्या प्रकरण- हनिमूनदरम्यान मेघालयात बेपत्ता झालेली  सोनम रघुवंशी  सापडली! पोलिसांचा खळबळजनक दावा सी.एम चाही मोठा खुलासा…

सायबर फ्रॉडपासून बचावासाठी जागरूक राहा – डॉ. धनंजय देशपांडे नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने विशेष कार्यशाळा.

कृपया प्रसिद्धीसाठी-कोवळ्या बालकांसाठी ‘गोमांस’ खाण्याचा अजब सल्ला! वाशी रुग्णालयातील आक्षेपार्ह पत्रक नष्ट करून सर्व दोषींवर गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना समाजात दिवाळीपर्यंत आर्थिक मदतीबाबत मोठी अपेक्षा होती. पण निधी येण्यात वेळ लागत असल्याने शेतकरी हवालदिल..

vishwatmaklokswamivarta