vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण .

चौकशी अहवालातील ‘एमपीएससी’ अधिकाऱ्यांचा उल्लेख अनावधानाने; पोलिसांकडून स्पष्टीकरण

मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंबंधी गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असा झालेला उल्लेख अनावधानाने झाला असल्याचे नागपूर शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. संबंधित उल्लेख चुकीचा असून, प्रत्यक्षात ‘जॉईंट कमिशनर व इतर, एक्साईज विभाग’ असा उल्लेख अभिप्रेत असल्याचे पोलिसांच्या अंतिम अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक, सा. सु. वि. गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांना दि. ३ एप्रिल २०२६ रोजी सादर केलेल्या पत्रात, गुन्हे शाखा, नवी मुंबई येथे दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीअंती ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर’ दोषी आढळल्याचे नमूद करण्यात आले होते.

या उल्लेखाच्या अनुषंगाने पुढील स्तरावर सविस्तर चौकशी करण्यात आली. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर केलेल्या अहवालात या बाबत वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. सामाजिक सुरक्षा कक्षाच्या तत्कालीन पोलीस निरीक्षकांकडे चौकशीसाठी देण्यात आलेल्या तक्रार अर्जाच्या चौकशी अहवालात ‘सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असा उल्लेख अनावधानाने झाला होता. हा उल्लेख चुकीचा असून, प्रत्यक्षात ‘जॉईंट कमिशनर व इतर, एक्साईज विभाग’ असा उल्लेख असणे अपेक्षित होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या ‘एमपीएससी सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका’ या वृत्ताबाबत नागपूर शहर पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे. सदर वृत्त उपलब्ध अधिकृत चौकशी अहवालातील वस्तुस्थितीशी सुसंगत नसून, चौकशी अहवालातील चुकीच्या उल्लेखामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे उपसचिव यांनी कळविले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

भारतीय रेल्वेने तीन विभागांमध्ये 472 किमी मार्गावर ‘कवच 4.0’ सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून अंमलबजावणीला दिली गती एकाच दिवसात कवच प्रणालीचे आतापर्यंतचे सर्वाधिक कार्यान्वयन साध्य

vishwatmaklokswamivarta

आमदार डॉ. संजय कुटे यांच्या मातोश्रींचे निधन,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट

आरटीई’ टप्पा क्र. ४ प्रवेशासाठी मुदतवाढप्रवेश प्रक्रिया आता ९ जून २०२५ पर्यंत..

पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून त्यासाठी जलजागृती होणे आवश्यक- पोलीस अधीक्षक संदीप घुगे- जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा शुभारंभ…

जिल्ह्यात डिजिटल जनगणनेचा बिगुल-हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाई

कॉर्पोरेट जिहाद’ संदर्भात झारखंडचे राज्यपाल पंतप्रधानांशी चर्चा करणार;हिंदु जनजागृती समितीने दिले निवेदन