
पाकिस्तानातून भारतीय मच्छिमारांची करणार सुटका, परराष्ट्र मंत्री बिलावल बुट्टो जरदारी यांच्या भारत भेटीदरम्यान घेतला निर्णय…
विदेश प्रतिनिधी
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पाकिस्तानने सदिच्छा म्हणून 600 भारतीय मच्छिमारांची करणार असल्याचे सांगितले
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पाकिस्तानने सदिच्छा म्हणून 600 भारतीय मच्छिमारांची सुटका करणार असल्याचे सांगितले. मच्छिमारांनी सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यासाठी या लोकांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. अहवालानुसार, 600 मच्छिमारांपैकी 200 मच्छिमारांना 12 मे रोजी सोडण्यात येणार आहे. उर्वरित 400 मच्छिमारांना 14 मे रोजी सोडण्यात येणार आहे.
बिलावल भुट्टो यांनी शुक्रवारी गोव्यातील बेनौलिम येथे एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत याकडे सकारात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. गेल्या 12 वर्षांत भारताला भेट देणारे बिलावल हे पहिले पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री आहेत. 2011 मध्ये, पाकिस्तानच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी भारताला भेट दिली. त्यांचे तत्कालीन समकक्ष एसएम कृष्णा यांच्याशी चर्चा केली.
2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ उपस्थित होते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे पाकिस्तानी समकक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या उपस्थितीत एससीओच्या बैठकीत स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व प्रकारचा दहशतवाद आणि त्याचे वित्तपुरवठा थांबवला पाहिजे



