vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री युवकार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढविण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी ट्रेनी शिक्षकांनी केली आहे. महाराष्ट्र युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या योजनेची अंमलबजावणी झाली असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक व युवतींना कार्यरत करण्यात आले असून सदरील कालावधीमध्ये शैक्षणिक वर्ष पूर्ण होत नसल्याने प्रशिक्षण हे अपूर्ण राहत आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची बाब विचाराधीन ठेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

व ट्रेनी (शिकाऊ) शिक्षक यांचे किमान प्रशिक्षण पूर्ण होण्याचा अनुषंगाने विचार करून आपण ट्रेनी शिक्षक यांना सदरील नियुक्ती शाळेवर किमान कार्यकाळ वाढवून मिळावे ही अपेक्षा आहे.करिता सदरील विषयाचा

गांभीर्यपूर्वक विचार करून ट्रेनी शिक्षक यांना नियुक्ती शाळेवर शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने किमान कार्यकाळ वाढवून देण्यात यावा ही एकमेव मुख्य मागणी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर जातीने लक्ष केंद्रीत करून

न्यायाची भूमिका घेत कार्यकाळ वाढवून देण्याची जलद गतीने कार्यवाही करावी अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थी छत्रपती संभाजी नगर तालुका अध्यक्ष मा.श्री. विजय राठोड सर, वैशाली चव्हाण मॅडम, पूजा राठोड मॅडम, माधुरी इंगळे मॅडम, कविता घुगे मॅडम, मनीषा मदन मॅडम, विष्णू लघुटे सर, दिनेश ठोंबरे सर, भरत गाडेकर सर, नारायण तांबे सर, वंदना मॅडम, तुषार पवार सर, बिबीशन चव्हाण सर, भगवान पठाडे सर, प्रियंका मनगटे मॅडम, शुजाता शेंगडे मॅडम, शेख इम्रान सर, गणेश आहेर सर, जेव्हेरिया मॅडम शहेनाज पठाण हिना शेख सिमा पटेल इत्यादी युवा प्रशिक्षनार्थी उपलब्ध होते.

संबंधित पोस्ट

अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबईच्या महापौरपदी श्रीम.सुजाता पाटील व उपमहापौरपदी श्री.दशरथ भगत विराजमान…

vishwatmaklokswamivarta

अंबरनाथ सारख्या जागरूक व गतिमान शहरातील ही न्यायालयाची वास्तू न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रतिबिंब ठरेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची तनु भान देशातील ‘सर्वोत्कृष्ट कॅडेट’ पंतप्रधान मोदींच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित

vishwatmaklokswamivarta

पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा वमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (इंटर्नशिप) उमेदवार निवड मेळाव्याचे आयोजन