vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

देशी गायींच्या पालनपोषण अनुदान योजनेसाठी,अर्ज करण्यासाठी 26 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

 

       व्यावसायिक प्रतिनिधी- सांगली,  : ग्रामीण भागातील गोशाळा संचालकांना ऑनलाईन अर्ज भरतांना आलेल्या तांत्रिक अडचणी तसेच काही अपरिहार्य कारणांमुळे देशी गाईंसाठी अनुदान योजना अंतर्गत अर्ज न करू शकलेल्या परंतु प्रत्यक्षात सदर योजनेचा लाभास पात्र असणाऱ्या गोशाळांना अर्ज करण्याकरिता २६ जानेवारी २०२५ पर्यन्त मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरिता सन २०२४-२५ पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालनपोषणासाठी प्रति दिन प्रति गोवंश पन्नास रूपये अनुदान देण्यात येते. यासाठी जिल्ह्यातील गोसंगोपनाचा किमान ३ वर्ष अनुभव असलेल्या, गोशाळेत किमान ५० गोवंश व संस्थेतील ईयर टॅगिंग (भारत पशुधन प्रणालीवर) असलेले तसेच गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांमधील देशी गाई अनुदानास पात्र आहेत.

या योजनेचे सुधारित नियोजित वेळापत्रक, अटी व शर्ती, अंमलबजावणी, योजनेचा ऑनलाईन अर्ज व त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती https://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु त्रुटी पूर्तता करिता अर्जदारास परत पाठविण्यात आलेल्या गोशाळांची यादी त्रुटी पूर्तता करिता संकेतस्थळावरील “त्रुटी असलेले अर्ज” या मेनू वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पंढरपूर तीर्थक्षेत्राचा समग्र विकास येत्या 30 महिन्यांत पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर तीथक्षेत्र विकासासाठी 4150.46 कोटीच्या विकास आराखड्यास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपा जालना महानगर जिल्ह्यात “मन की बात” कार्यक्रम संपन्न”पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मार्गदर्शन हे प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे