vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत-माजी मंत्री नेते छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; ईडीची याचिका फेटाळली..

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत-माजी मंत्री नेते छगन भुजबळांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; ईडीची याचिका फेटाळली..

राज्य प्रतिनिधी

-नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत माजी मंत्री छगन भुजबळ सव्वादोन वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.भुजबळ यांचा जामीन रद्द करावा, यासाठी ‘ईडी’ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली आणि याचिका फेटाळण्यात आली आणि मुंबई हायकोर्टाचा जामीन देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे

 नवी दिल्ली येथील कथित महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याबाबत माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ सव्वादोन वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता. भुजबळ यांचा जामीन रद्द करावा, यासाठी ‘ईडी’ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. यामध्ये ‘ईडी’चा दावा फेटाळण्यात आला असून मुंबई हायकोर्टाचा भुजबळ यांना जामीन देण्याचा निर्णय कायम ठेवत सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे.

भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अनियमिततेचा खटला दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात बांधकाम व्यावसायिकाशी शासनाने केलेल्या करारात अनियमितता व बेहिशोबी मालमत्ता यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात भुजबळ सव्वादोन वर्षे कारागृहात होते. छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात २०१८ मध्ये मुंबई न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यास सक्तवसुली निर्देशानलयातर्फे (ईडी) सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने मंगळवारी दिलेल्या निर्णयामुळे भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन देताना दिलेल्या आदेशात स्पष्ट निर्देश असल्याचे नमूद केले. कलम १३६ अन्वये त्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यामुळे ‘ईडी’ची विशेष अनुमती याचिका फेटाळण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले.000000

संबंधित पोस्ट

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे  दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल- जलसंपदा मंत्री राधाकृष विखे-पाटील

vishwatmaklokswamivarta

उत्तरकाशी भूस्खलन, पूरस्थिती; महाराष्ट्रातील पर्यटक सुरक्षित, बहुतांश पर्यटक आज राज्यात परतणार-आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

कोकणचा विकास हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा — उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार रोहा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

८०० संघटनांचा सनातन संस्कृती रक्षणाचा निर्धार !**‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोपातून शौर्याची प्रेरणा !*

vishwatmaklokswamivarta