vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

 

         राज्य प्रतिनिधी   मुंबई,: महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक मृत्यू झाला असून 3 वाघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर 3 वाघांची शिकार करण्यात आली असून याबाबत चौकशी सुरु असल्याचे वन विभागाने कळविले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व वनपरिक्षेत्रात 2 जानेवारी 2025 रोजी वाघांच्या आपसातील हल्ल्यात मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात 6 जानेवारी रोजी एका वाघिणीचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाला. या वाघाच्या शिकारीत सहभागी असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पांढरकवडा वनविभाग अंतर्गत वणी येथे 7 जानेवारी रोजी एका वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला असून या वाघिणीचे दात, पंजे गायब असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूरच्या देवलापार वनपरिक्षेत्रात 8 जानेवारी रोजी एका बछड्याचा विजेचा धक्का देऊन मृत्यू झाला असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र वनक्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्रात 9 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. गोंदिया येथील दासगाव वनपरिक्षेत्रात दिनांक 14 जानेवारी रोजी आजारपणामुळे एका वाघाचा मृत्यू झाला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नागपूर येथील देवलापार वनपरिक्षेत्रात 15 जानेवारी रोजी एका बछड्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सिंदेवाही वनपरिक्षत्रात 19 जानेवारी 2025 रोजी रेल्वेला घडकून अपघात झाला आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प शिवणी वनपरिक्षेत्रातील एका बछड्याचा दिनांक 20 जानेवारी रोजी नैसर्गिक मृत्यू झाला तर 21 जानेवारी रोजी पेंच व्याघ्र प्रकल्प नागलवाडी वनपरिक्षेत्रात एका वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तसेच वर्धा वनविभागातील समुद्रपूर येथे एका बछड्यांचा रस्ते अपघातात 22 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला असून शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे वन विभागाने कळविले आहे.000

संबंधित पोस्ट

आसामच्या जोरहाटमध्ये 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरेचा 26 वा दीक्षान्त समारंभ…भारत देशाची 2047 पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल.– राज्यपाल

कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा या जातींचा नामोल्लेख दस्ताऐवज २४ नोव्हेंबर पर्यंत सादर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दूध अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार- दुग्ध व्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

_हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे प्रसिद्धीपत्रक_ *‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी*