vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय विभागाच्या पुरस्कारांसाठी15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यातील इच्छुक स्वयंसेवी संस्था व व्यक्ती यांनी पुरस्कारासाठी त्यांचे विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली यांच्याकडे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत सर्व आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे. महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांकरिता समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक (व्यक्ती) यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2023-24 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्जाचा नमुना सहायक आयुक्त, समाजकल्याण, सांगली या कार्यालयात तसेच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी पुरस्काराची सविस्तर जाहिरात दिनांक 1 फेब्रुवारी 2025 रोजीच्या राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रामध्ये प्रसारीत करण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती कराव-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पदभरतीत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गाच्या पदसंख्येत वाढ – पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन* 

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

 – ट्रिपल तलाक कायद्याची राज्यात काटेकोर अंमलबजावणी होणार– गृह राज्यमंत्री योगेश कदम

नगरपरिषदांच्या सदस्य व अध्यक्ष पदांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2025 जाहीर

vishwatmaklokswamivarta