vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्मठळक बातम्या

आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष पद भारताच्या माननीय राष्ट्रपती भूषवणार*

*आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्ष पद भारताच्या माननीय राष्ट्रपती भूषवणार*

 

राज्य प्रतिनिधी –

दहाव्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला राजकारण उद्योग कला आणि सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या अनेक स्त्रियांबरोबरच भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमु उपस्थित राहणार आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर, बेंगलोर येथे १४ ते १६ फेब्रुवारी पर्यंत आर्ट ऑफ लिविंग ने आयोजित केलेल्या या ऐतिहासिक मेळाव्याला ६० हून अधिक वक्ते आणि पाचशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित असतील.

सुमारे दोन दशकांपासून आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 115 देशा मधील 463 मान्यवर वक्ते आणि सहा हजार व्यक्तींना एकत्र आणले आहे .

यावर्षी भारताच्या माननीय राष्ट्रपतींसह

कर्नाटकचे आदरणीय राज्यपाल श्री थावरचंद गहलोत ,

आदरणीय केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी, आदरणीय खासदार शोभा करंडलजे, भारताच्या माजी परराष्ट्र व सांस्कृतिक राज्यमंत्री श्रीमती मीनाक्षी लेखी , आदरणीय राज्यमंत्री श्रम व रोजगार मंत्रालय आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कॉमनवेल्थ च्या सचिव आदरणीय श्रीमती पॅट्रिका स्कॉटलंड, जपानच्या माजी पंतप्रधानांची पत्नी अकी अबे, चित्रपट दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी , दिग्गज अभिनेत्री हेमामालिनी शर्मिला टागोर बॉलीवूड तारका सारा अली खान , सोनाक्षी सिन्हा आणि प्रतिथयश उद्योजिका राधिका गुप्ता आणि कनिका टेकरिव्वाल या सहभागी होतील.आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे अध्यक्षपद गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या भगिनी श्रीमती भानुमती नरसिंहन भूषवणार आहेत. गुरुदेवांच्या तणाव मुक्त व हिंसामुक्त जगाचे स्वप्न साकार करण्यात त्यांचा सहभाग आहे .

180 देशात कार्यरत असलेल्या ना नफा तत्वावर चालणाऱ्या आर्ट ऑफ लिविंग या संस्थेत त्या स्त्रियांसाठी कल्याणकारी योजना व बालसंगोपन कार्यक्रम राबवतात .

सखोल आध्यात्मिकता आणि मानवसेवेची व्यापक दृष्टी असलेल्या श्रीमती भानुमती यांनी चारहून अधिक दशके शिक्षण, पर्यावरणाची शाश्वता व स्त्रियांचे सक्षमीकरण याद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणले आहेत.”जस्ट मी” ही गुरुदेव श्री श्री शंकर यांची कविता केंद्रबिंदू ठेवून , या परिषदेत नेतृत्व स्व चा शोध आणि सबलीकरण यावर भर दिला जाईल. या परिषदेच्या सांस्कृतिक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सव तसेच सीताचरितम ही सांगितिका सादर होईल.

 500 कलाकार व तंत्रज्ञांनी सादर केलेले सीता चरित्र राम आणि सीतेच्या कथेवर एक वेगळाच प्रकाशझोत टाकेल.

 या कथेतील नाट्य व भावना मूळ संगीता सह इंग्रजी भाषेत सादर केल्याने त्या आजच्या प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल.

या वर्षीच्या परिषदेत एक विशेष विभाग देखील आहे, “स्टाइलिश इनसाईडआउट: फॅशन फॉर ए कॉझ”, ज्यामध्ये प्रमुख भारतीय डिझायनर्स जसे की सव्यसाची, राहुल मिश्रा, मनीष मल्होत्रा, आणि रॉ मँगो यांच्या डिझायन्सचा समावेश आहे. या डिझायन्सचे लिलाव होईल आणि त्यातून मिळालेली रक्कम ‘आर्ट ऑफ लिविंग फ्री स्कूल्स’ च्या समर्थनासाठी वापरण्यात येईल.

जेव्हा जगभर नेतृत्व आणि लिंग भूमिकांमध्ये मोठे बदल पाहिले जात आहेत,तेव्हा राष्ट्रपती मुर्मू यांच्या उपस्थितीने आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिषदेतून मिळालेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरण्यात येईल. ‘आर्ट ऑफ लिविंग फ्री स्कूल्स’ देशभर 1300+ शाळा चालविते, ज्यामुळे 100,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे जीवन प्रभावित होत आहे. पारंपरिक नेतृत्व परिषदांच्या तुलनेत, ही परिषद एक सर्वसमावेशक अनुभव प्रदान करते— बौद्धिक चर्चेपासून आध्यात्मिक सराव, सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि सेवा-आधारित सामाजिक उपक्रमांपर्यंत सर्व पातळ्यांवर.

ही परिषद शहरी आणि ग्रामीण महिलांमधील एक सेतु म्हणून काम करते, त्यांना एकमेकांशी जोडते आणि सक्षमीकरण प्रोत्साहित करते. ‘आर्ट ऑफ लिविंग फ्री स्कूल्स’ च्या शिक्षकांची 22 राज्यांमधून उपस्थिती असणार आहे, ज्यामुळे जागतिक मंचावर मूळ समस्येवर आधारित दृष्टिकोन मांडला जाईल.

ही परिषद एक संवाद नाही— तर एक चळवळ आहे जी महिलांच्या नेतृत्वाचा उत्सव साजरा करते आणि ‘फक्त राहण्याची’ , आंतरिक प्रवासाची सुरुवात दर्शवते.

संबंधित पोस्ट

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बसेसची संख्या वाढवावी- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· परिवहन सेवा सक्षम करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

19 फेब्रुवारीला शिवजयंती निमित्ताने“जय शिवाजी जय भारत”पदयात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन