vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

शिवजयंतीचे औचित्य साधून कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न

ठाणे, प्रतिनिधी:- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या निर्देशानुसार मृद व जलसंधारण विभागामार्फत दि.19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यामधील शिवकालीन तलाव, बंधारे, प्राचीन गाव तलाव, गावतळे व पाणी पुरवण्यासाठी वापरले जाणारे सध्याचे तलाव यामधील गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. ग्रामपंचायत अथवा स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने जिल्ह्यात कमीत-कमी एक अथवा मतदारसंघनिहाय एक तलाव घेऊन शिवजयंतीच्या दिवशी काम सुरु करण्याबाबतचे निर्देश प्रत्येक जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना देण्यात आले होते.

त्यानुषंगाने कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये बंधारे, गाव तलाव व लघु पाटबंधारे तलावातून गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यातील कळमगाव खरमेपाडा सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच, लोकसहभागातून पालघर जिल्ह्यातील सावरे एंबूर येथील पाझर तलावातील गाळ काढण्याची मोहीम सुरु करण्यात आली. तसेच, पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात अणवीर येथील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात शिवजयंतीचे औचित्य साधून विन्हेरे लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातीलराजेवाडी लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील जानवली लघु पाटबंधारे तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सूचनेनुसार गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत 100 दिवसात राज्यातील तलावातून जास्तीत जास्त गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यामुळे धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात देखील वाढ होण्यास मदत होणार आहे.00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

इमाव बहुजन कल्याण विभागामार्फत समाजसेवी संस्थांना पुरस्कार; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta