मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक.
मुंबई प्रतिनिधी-कांजूरमार्ग कचरा डेपोमुळे परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास कमी व्हावा यासाठी दुर्गंधी रोखण्यासाठीची उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवावी. दुर्गंधी प्रतिरोधक फवारणी वाढवून त्याचं संनियंत्रण करण्यात यावं , कचरा डेपोमध्ये बांबुची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी. रहिवाशी भाग जवळ असलेल्या कचरा डेपोतील क्षेत्रात कचरा प्रक्रिया न करता ती लांब अंतरावर करण्यात यावी. यासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावं असे उपमुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश.