vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावी राबवा-क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

 

मुंबई प्रतिनिधी- राज्यातील अल्पसंख्याक घटकाचा सर्वांगिण विकास व्हावा, याकरिता अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्याक विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

 अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपसचिव मिलींद शेणॉय, जिल्हा नियोजन अधिकारी उपस्थित होते.

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविणे या योजनेंतर्गत प्राप्त प्रस्तावांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजनेंतर्गत प्राप्त प्रशिक्षण संस्थाचे प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे. (मुंबई, ठाणे, पुणे, छ. संभाजीनगर, नागपूर, नाशिक व अमरावती) निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण संस्थाच्या प्रस्तावांची छाननी करून शासनास सादर करणे, प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम (PMJVK), शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थी-विद्यार्थीनी यांच्या आहाराकरिता थेट रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करणे अशा विविध योजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला.000

संबंधित पोस्ट

आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र इंटेलिजन्स युनिटची स्थापना- गृह राज्य मंत्री योगेश कदम

मुंबईत बीइएसटी बेस्टच्या तिकीट दरात दुप्पट वाढ; ८ मेपासून नवे दर लागू

शिक्षक पात्रता परीक्षा वेळापत्रक जाहीरपनवेल शहरातील एकूण 6 केंद्रांवर घेण्यात येणार परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे, या तिनही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही,पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात. कबूतरखाना परिसरात कबुतरांच्या खाद्यपुरवठ्यावर निर्बंध आल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर ओढवू नये, यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत आपल्या संवेदनशील मनाची पुन्हा एकदा ओळख देत कबुतरांचे प्राण वाचवून नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेतला.

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी…