vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..  

पोलीस व पत्रकारांनी निराधार वृद्धाला दिला वृद्धाश्रमाचा आधार पोटच्यानी केले निराधार तर परक्यानी दिला आधार..

 

चिखली : प्रतिनिधी- वडिलांच्या कष्टाची शेती मुलं सुनानी लाडीगूलाबी लावून बक्षीस पत्र करून घेतली उर्वरित शेती विकून मुलींनी सुद्धा पैसे काढून घेतमारहाण करून घराबाहेर हाकलून दिल्याने पोलीस व पत्रकार यांनी सदर वृद्धाला तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात दाखल करून माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती दिली आहे.

 ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम,भोकर येथे निराधार बेघर घरातून काढून दिलेले ज्यांना मुल मुली व इतर नातेवाईक असून सुद्धा त्यांना सांभाळू शकत नाही असे आजी आजोबा,यांना सर्व सुविधा देऊन मोफत संगोपन होत आहे. मानवाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस म्हणजे वृद्धपकाळ हा सुखद व आनंदमई जावा यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांना बोलावून सदर आजोबांची हकीकत सांगून पोलीस स्टेशन रायपूर चे ए एस आय अमोल घाटे, संजय चवरे, पत्रकार गणेश अंभोरे व अकील अहमद यांच्या शिफारशी वरून क्षणाचा हि विलंब न करता वृद्धाश्रम च्या नियमानुसार प्रवेश अर्ज भरून त्या निराधार बेघर आजोबांना वृद्धाश्रमात आश्रय मिळून दिला आहे. वृद्ध आजोबा ना वृद्धाश्रमात आश्रय दिल्याने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित पोस्ट

राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची पारदर्शक व निष्पक्ष चौकशी होणार

राज्य शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत करण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी केली बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी; शेतकऱ्यांशी साधला संवाद

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती-29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार- राज्य लोकसेवा आयोगाची माहिती

जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार- जिल्हाधिकारी आशिष येरेकर..

vishwatmaklokswamivarta

श्री महालक्ष्मी महिला शेतकरी गटाकडून 200 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती

vishwatmaklokswamivarta

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

vishwatmaklokswamivarta