vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

दशसुत्रीची सिद्धता;जंगलातांडा येथील विद्यार्थ्यांनी चटकन सोडविले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले गणित..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात दशसूत्री हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत आहे. या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. दुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य वाढीस लागतांना दिसत आहेत. याचा प्रत्यय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच आला. जंगला तांडा या सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत.

 जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तालुक्याच्या भेटीवर असतांना अचानक जंगला तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली. उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार मनिषा मेने, गटविकास अधिकारी डी.एस. अहिरे, गटशिक्षणाधिकारी रंगनाथ आढाव, केंद्रप्रमुख फिरोज तडवी तसेच मुख्याध्यापक रामदास पुसे यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील दशसूत्री अंमबजावणीबाबत त्यांनी माहिती घेतली. त्याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी हे इयत्ता दुसरीच्या वर्गात गेले. तेथे त्यांनी गणिताचा तास घेतला. काही गणिते विद्यार्थ्यांना सोडवावयास दिली. त्यावर अनेक प्रश्नही विद्यार्थ्यांना विचारले. या चुणचुणीत लहान मुलींनी त्यांना उत्तरे दिली. विद्यार्थ्यांचे गणिती कौशल्य वाढल्याचे दिसून आले. त्यासाठी शिक्षणाच्या अभिनव पद्धतीचा अवलंब शाळेत करण्यात येतो असे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले. जिल्हाधिकारी स्वामी यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. शिक्षक व मुख्याध्यापकांचेही कौतुक केले. शाळेत विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, शालेय परिसरातील भौतिक सुविधा या सारख्या उपक्रमांचेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी कौतुक केले.

०००००

संबंधित पोस्ट

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या बांधकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता

दिव्यांग व्यक्तींनी विवाह प्रोत्साहन योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सांगली विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राच्या ठिकाणी,मतदार पडताळणीसाठी 25 ते 27 मार्चपर्यंत विशेष कॅम्प

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

अग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विकसित कृषि संकल्प अभियान अंतर्गत शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेती तंत्रज्ञान समजून घेण्याचे आवाहन – केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव

vishwatmaklokswamivarta