vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

महाराष्ट्र शिक्षक परीक्षा पात्रता परीक्षा २०२४-राखीव निकालांची सुनावणी दि.२५ पासुन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी –महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दि.१० नोव्हेंबर २०२४ रोजी झाली होती. या परीक्षेतील ७८६ उमेदवारांचा निकाल काही कारणास्तव राखीव ठेवण्यात आला आहे. या उमेदवारांना आपले म्हणणे मांडता यावे यासाठी दि.२५ मार्च ते दि.४ एप्रिल दरम्यान सकाळी ११ वा. सुनावणी होणार आहे. तरी उमेदवार निहाय दिलेल्या नियोजनप्रमाणे उमेदवारांनी आपले म्हणणे मांडण्याकरीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयात उपस्थित राहणेबाबतचे पत्र संबंधित उमेदवारांच्या ई-मेल एस.एम.एस व परीक्षार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांना कळविण्यात आलेल्या दिवशी सकाळी ११ वा. स्वखर्चाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे. हजर न राहिल्यास उमेदवारांना या प्रकरणी काही सांगावायचे नाही असे गृहीत धरुन त्याबाबत उपलब्ध पुराव्याच्या आधारे निर्णय घेण्यात येईल व तो निर्णय बंधनकारक राहील. सुनावणीच्या वेळी उमेदवारांनी आधारकार्ड, शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ मधील उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी, परीक्षेचे प्रवेशपत्र पुराव्यासाठी परीक्षेच्या संदर्भातील आवश्यक असलेले अनुषंगिक सर्व कागदपत्रे, गुणपत्रक, प्रमाणपत्र तसेच फोटो ओळखपत्र, (चालक, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट) यापैकी कोणतेही एक यासह स्वत: उपस्थित राहावे. सुनावणीच्या वेळी आपल्या वतीने अन्य कोणालाही उपस्थित राहता येणार नाही याची नोंद घ्यावी,असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद आयुक्त श्रीमती अनुराधा ओक यांनी कळविले आहे.०००००

संबंधित पोस्ट

येत्या २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात अवतारणाऱ्या ‘आर के योगिनी फिल्म्स प्रॉडक्शन प्रा. लि.’ निर्मित ‘मिशन अयोध्या’ या प्रदर्शन सोहळा,कलाकारांची भव्य एंट्री आणि प्रेक्षकांचा कडकडाट

vishwatmaklokswamivarta

उ‌द्योजकता, कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना देणार भेट

नवी मुंबईत करावेच्या ज्ञानदीप शाळेत चिमुकल्या बाल हातांनी घडविल्या पर्यावरणपूरक सुबक गणेशमूर्ती

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक समाधी मंदिर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थळ-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठी गती…

vishwatmaklokswamivarta

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ