vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

*मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अंतर्गत जालन्यातील 800 लाभार्थी आयोध्यासाठी रवाना**भाजपा नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी दाखवली हिरवी झेंडी*

 

जालना (प्रतिनिधी) : – महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये अनेक तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गानं प्रवास करत असतात, याच पार्श्वभूमीवर राज्यातील वयोवृद्धांना तीर्थयात्रा करणं सुलभ आणि सोपं व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत प्रवाशांना प्रवास मोफत असणार आहे.

याच योजनेअंतर्गत निवड केलेले जालना जिल्हयातील जवळपास 800 लाभार्थी (राम भक्त)  जालना रेल्वे स्थानकातून संध्याकाळी 7.00 वा प्रवासा करिता रवाना झाले आहेत, भक्तांच्या या सुखकर प्रवासासाठी माजी रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आ.नारायण कुचे, बद्रीनाथ पठाडे, राजेश राऊत, सतीश जाधव, अर्जुन गेही, सिद्धिविनायक मुळे, शशिकांत घुगे, धनराज काबलीये, सुनील आरदड, स्टेशन प्रबंधक विनोद भारती, समाज कल्याण अधिकारी गीता कुटे आदींची उपस्थिती होती

संबंधित पोस्ट

पीएम नरेंद्र मोदींनी संगममध्ये श्रद्धेने स्नान केले, गंगा मातेला आदरांजली वाहिली

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta

जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या,माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसोबत राज्याची सकारात्मक चर्चा

नगरपालिका प्रभाग रचना कालमर्यादेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

खुल्या प्रवर्गातील युवकांना २१ दिवसांचे उद्योजकता प्रशिक्षण‘अमृत’चा उपक्रम