vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कालवा कार्यक्षेत्रात 31 मे पर्यंत मनाई आदेश लागू

 

 सांगली प्रतिनिधी:- आरफळ कालव्याचे उन्हाळी आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता व सर्व लाभधारकांना सम प्रमाणात पाणी वाटप होण्याकरिता जिल्हादंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार कडेगाव, पलूस, खानापूर व तासगाव तालुक्यातील एकूण 37 गावामध्ये आरफळ कालवा कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता दि. 10 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे.

 या आदेशानुसार कडेगाव तालुक्यातील शेळकबाव, शिरगाव, वांगी व रामपूर, पलूस तालुक्यातील आंधळी, मोराळे, बांबवडे, सांडगेवाडी, पलूस व कुंडल, खानापूर तालुक्यातील भाळवणी, कमळापूर, आळसंद, तांदूळवाडी, वाझर व बलवडी, तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, बोरगाव, लिंब, विसापूर, पानमळेवाडी, शिरगाव (वि), ढवळी, तासगाव, चिंचणी, वासुंबे, कवठेएकंद, बेंद्री, शिरगाव (क), नागाव कवठे, कुमठे, निमणी, येळावी, राजापूर, तुरची या गावांमध्ये कालव्या लगतच्या दोन्ही काठापासून 200 मीटर अंतरावर दि. 10 एप्रिल 2025 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 मे 2025 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही, असे आदेशात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अंबाला येथील अन्नातून विषबाधा; रुग्णांवर उपचार सुरु

ई-पीक पाहणी नोंदणी २४ मेपूर्वी करा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आवाहन

विमुक्त जाती-भटक्या जमातीतील कलाकार व कारागिरांसाठीच्या नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

आदिवासी आश्रमशाळेत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

vishwatmaklokswamivarta

कर्णपुरा यात्रोत्सव पूर्वतयारी आढावाशासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta