vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना, मे (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त रांगोळी, वेशभूषा व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजपा जिल्हा कार्यालय जालना येथे (दि.०३) जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

रांगोळी स्पर्धेत वैष्णवी धर्माधिकारी प्रथम, निकिता दडके द्वितीय, भक्ती खर्डेकर तृतीय, उज्वला काळे विशेष, सानिका शिराळकर उत्तेजनार्थ; वेशभूषा स्पर्धेत कोमल देशपांडे प्रथम, नलिनी शिरसाट द्वितीय, योगिता टापर तृतीय, सौंदर्य ढेरे व पूजा वानखेडे उत्तेजनार्थ; निबंध स्पर्धेत आरती सदावर्ते प्रथम, प्रज्ञेश पाठक द्वितीय, आदिती सुरंगळीकर तृतीय, नीता वायाळ व अंतरा कुलकर्णी उत्तेजनार्थ ठरल्या असून परीक्षक म्हणून विद्या दाबके, विजया कुलकर्णी व परविन आनंद यांचे योगदान लाभले.

यावेळी आपल्या मनोगतात जालना महानगर जिल्हाध्यक्ष मा. भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य हे आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे. त्यांनी कोणत्याही पदाचा गर्व न बाळगता अत्यंत साधेपणाने, परंतु ठाम आणि न्यायनिष्ठ मार्गाने राज्यकारभार केला. सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, धर्म, शिक्षण आणि लोककल्याणाच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे अविस्मरणीय आहे. अशा या महान स्त्रीच्या कार्याचे स्मरण आणि त्यातून प्रेरणा घेणे, हेच खरे तिच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आपण देऊ शकणारे सर्वोत्तम अभिवादन आहे. आजच्या स्पर्धांमधून लहानग्यांनी, युवक-युवतींनी तिच्या कार्याशी एकात्मता साधली आहे, हे विशेष आनंदाचे आणि अभिमानाचे आहे. अहिल्यादेवींसारख्या थोर व्यक्तिमत्त्वावर आधारित उपक्रमांमुळे समाजात मूल्यसंस्कार रुजतात, तर नव्या पिढीला आपली संस्कृती आणि इतिहास समजतो. यासाठी या कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या सर्व संयोजकांचे, स्पर्धकांचे आणि मार्गदर्शकांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार.तर या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सौ. शुभांगी ताई देशपांडे, सौ. संध्या ताई देठे, आणि सौ. अरुणाताई जाधव यांचे बहुमूल्य योगदान लाभले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीपासून ते स्पर्धकांचे स्वागत, स्पर्धांचे संचालन, व्यवस्था व समन्वय, पाहुण्यांचे नियोजन, तसेच बक्षीस वितरणापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांनी अत्यंत कुशलतेने आणि आत्मीयतेने जबाबदारी पार पाडली. त्यांच्या समर्पित सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी व संस्मरणीय ठरला. (अभिप्राय : सौ. शुभांगी ताई देशपांडे: अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त असा उपक्रम आयोजित करणे खूप आनंददायक आणि अभिमानास्पद आहे. या कार्यक्रमातून युवक-युवतींमध्ये संस्कृतीची जाणीव वाढेल. सौ. संध्या ताई देठे: स्पर्धकांच्या उत्साहाने आणि सहभागाने हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. अशा कार्यक्रमांनी सामाजिक मूल्ये आणि संस्कृती जोपासली जातात. सौ. अरुणाताई जाधव: पूर्वतयारीपासून बक्षीस वितरणापर्यंत सर्व टप्प्यावर जबाबदारी निभावताना आम्हाला खूप आनंद मिळाला. भविष्यातही अशा उपक्रमांना साथ देऊ.

मंचावर मान्यवर उपस्थितांमध्ये बद्रीनाथ पठाडे, सिद्धिविनायक मुळे, शिवराज जाधव, सिद्धेश्वर हजबे व सुनील दडके, नीलावती ताई धावणे, सौ. विशाखा नाईक, सौ सुरेखा बोटुळे, वैशाली बनसोड, सौ पुष्पाताई मेहेत्रे, सौ. आशा भाले यांनी आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमास विशेष गौरव प्राप्त करून दिला.

संबंधित पोस्ट

डिजीटल युगात प्रत्येकाने जबाबदारीने इंटरनेट वापरावे- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

शेतकऱ्यांच्या आयुष्यात बैलांना फार महत्त्व असते, आपल्या बैलाला तो जिवापाड जपतो, गोवंश जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. गो मातेला राज्यमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील सर्व विभागात १ऑगस्टपासून बायोममॅट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

रायगड जिल्ह्याच्या प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा-जिल्हाधिकारी किशन जावळे*

आषाढीवारी 2025..!मानाच्या पालख्या, वारकरी अन्  भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट…