vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा  उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

ठाकरे बंधू पुन्हा एकत्र; विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांची जाहीर घोषणा

 उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ”हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!”

राज्य प्रतिनिधी

वरळीतील ऐतिहासिक मराठी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल दोन दशकांनंतर उभाठा उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र आले. मराठी अस्मिता, भाषा, संस्कृती आणि राजकीय स्वाभिमानाच्या मुद्द्यांवर या दोघांनी स्पष्ट आणि आक्रमक भूमिका मांडली. राज ठाकरे यांच्यानंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी राजकीय सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आणि ठामपणे सांगितलं, हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही आणि जर मराठीसाठी आवाज उठवणं गुंडगिरी असेल तर होय, आम्ही गुंड आहोत! या भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या, मराठी भाषेवरील हक्क, दिल्ली दरबारी नतमस्तक झालेल्या नेत्यांची लाचारी आणि महाराष्ट्रात मराठीची गळचेपी यावर परखड भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून आपण आजही त्याच विचारांसोबत उभं असल्याचं त्यांनी ठणकावून सांगित

 या: विजयी मेळाव्याच्या मंचावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “पुढे काय होईल सांगता येत नाही, पण ही मराठीची एकजूट अशीच कायम राहावी,” अशी भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.“बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकार व्हावं, हीच इच्छा आहे,” असंही त्यांनी भाषणाच्या शेवटी सांगितलं.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, “आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं हेच अधिक महत्त्वाचं आहे,” असे मत व्यक्त केले. ठाकरे बंधूंनी एकमेकांबद्दल सकारात्मक भाष्य केल्याने आणि एकत्र येण्याची जाहीर घोषणा केल्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.या मेळाव्यामुळे ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची सुरुवात झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

संबंधित पोस्ट

वृत्त विशेष- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत लातूर विभागातील चार बसस्थानकांची उत्कृष्ट कामगिरी

vishwatmaklokswamivarta

शौर्य, त्याग आणि सेवाभाव हिच पोलीसांची खरी ओळख – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

vishwatmaklokswamivarta

प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत स्वदेशी स्टेल्थ युद्धनौका उदयगिरी भारतीय नौदलाकडे सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या उपचारांसाठी कॉर्पस निधीची तरतूद करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांची संख्या १,३५६ वरून २,३९९ पर्यंत वाढविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेची स्वच्छता मोहीम आझाद मैदानावर

vishwatmaklokswamivarta