vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करावीत

           जालना प्रतिनिधी :- भारत सरकारकडून पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्यात येते. तरी सन 2025-26 वर्षामधील अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदविण्यासाठी प्राचार्यांनी महाविद्यालयीन शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त अर्ज नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजु एडके यांनी केले.

अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे भारत सरकार पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती व फ्रीशिप योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन सादर करण्यासाठी आज दि. 15 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील महाविद्यालयाच्या प्राचार्यांची सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी सन 2024-25 वर्षातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी तसेच महाविद्यालय लॉगिनवर प्रलबिंत असलेले अर्ज तात्काळ पडताळणी करून पात्र अर्ज मंजुर करण्यासाठी तसेच सन 2023-24 मधील ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटी अभावी विद्यार्थीं लॉगिनला पाठविण्यात आलेले आहेत त्यांना त्रुटी पुर्तता करून रिॲप्लाय करण्यासाठी दि. 31 जुलै 2025 अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. अशी सुचना सर्वांना देण्यात आली.

*-*-*-*-

संबंधित पोस्ट

शेती उत्पादन वाढ, शेतमाल निर्यातीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- कृषि विभागाच्या शेतकरी परिसंवादात प्रतिपादन- शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत वीज देयक शून्य;जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

ठाणे जिल्ह्यात गुंतवणूकदारांसाठी पोषक वातावरण; जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी समस्या निवारण करण्याचे दिले आश्वासन..

महाबोधी बुद्ध विहार मुक्तीसाठी पंचशिल धम्म ध्वज यात्रा आज जालन्यात नागपूर ते चैत्यभुमी दरम्यान पू.भन्ते विनाचार्य साधणार जनसंवाद

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत लातूर जिल्हा अग्रेसर!**महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केले जिल्हा प्रशासन, महावितरणच्या कामाचे कौतुक*