vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील उद्वाहन तपासणी अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि वेळेवर व्हावी, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर विधान परिषदेत सांगितले.सदस्य भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये राज्यातील उर्जा विभागाच्या विद्युत आणि उद्वाहन निरीक्षक कार्यालयाकडून होणाऱ्या उद्वाहन तपासणीसंदर्भात सूचना मांडली होती.

ऊर्जा राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सांगितले की, सध्या महाराष्ट्रात एकूण २,१७,६५२ लिफ्ट्स कार्यरत असून, उच्च न्यायालयाच्या २७ सप्टेंबर २०१२ रोजीच्या आदेशानुसार वर्षातून एकदा या लिफ्ट्सची तपासणी होणे बंधनकारक आहे. यापूर्वी ही जबाबदारी फक्त २ विद्युत निरीक्षकांच्या अधिपत्याखालील १२ सहाय्यक निरीक्षक आणि ३० अभियंत्यांवर होती, मात्र हे मनुष्यबळ अत्यल्प असल्यामुळे तपासणी प्रक्रिया मर्यादित प्रमाणातच होत होती.

२८ एप्रिल २०२५ पासून लिफ्ट तपासणीच्या सेवांचे विकेंद्रिकरण केले आहे. आता ४० विद्युत निरीक्षक, ७८ सहाय्यक विद्युत निरीक्षक आणि ३९७ सहाय्यक अभियंते या कामात सहभागी झाले असून एकूण २८८ अधिकाऱ्यांची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. तसेच तपासणीची गती वाढवण्यासाठी यापूर्वी कार्यरत असलेल्या ७१ अधिकाऱ्यांचे इतर गरजेच्या ठिकाणी समायोजन करण्यात येणार असून, यासाठी आवश्यक निर्णय पुढील ८ ते १५ दिवसांत घेतले जातील, असेही त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे उद्वाहन वापरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा नव्हे, तर दोनदा तपासणी करण्याचाही विचार करता येईल, असेही राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हा युवा महोत्सव उत्साहात संपन्न 

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सव सर्व विभागांनी समन्वयातून यशस्वी करावा*- पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

राज्यामध्ये प्रती आणि समृद्धी सरकार –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी आपला अन्नदाता, आपला मायबाप ; बियाणे अतिशय उत्कृष्ट प्रतीची हवीत

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई